शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘सीएम’च्या घोषणेनंतरही तूर खरेदी आदेश पोहोचलाच नाही

By admin | Updated: April 27, 2017 00:24 IST

केंद्र शासनाने तूर खरेदीचे शासकीय केंद्र पुढे सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन

पावसाचा धोका : ६५ हजार क्ंिवटल तूर उघड्यावर पडून यवतमाळ : केंद्र शासनाने तूर खरेदीचे शासकीय केंद्र पुढे सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करेल, अशी घोषणा मंगळवारी मुंबईत केली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु कालपासून प्रतीक्षा असलेला तूर खरेदीचा आदेश बुधवारी सायंकाळपर्यंतही पोहोचलेला नव्हता. त्यामुळे तूर खरेदीचा गुंता कायम आहे. मुख्यमंत्र्यांची तूर खरेदीची घोषणा फसवी ठरते की काय, अशी हूरहूर शेतकऱ्यांना लागलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी तुरीचा अखेरचा दाणा शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी करू, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात २२ एप्रिलनंतर शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी घोषणा केल्याने दुपारपर्यंत आदेश निघून बुधवारपासून तूर खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अद्याप आदेशच जारी झालेला नाही. त्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागते, याकडे लक्ष लागले आहे. तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात नऊ हजार शेतकरी बाजार समितींच्या आवारात मुक्कामी आहेत. घरापासून त्यांचा संपर्क तुटला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात मोजणीच्या प्रतीक्षेत ६५ हजार क्ंिवटल तूर पडून आहे. त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचा माल यार्डात आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर आहे. महिनाभरापूर्वी खरेदी होऊनही व्यापाऱ्यांनी आपला माल गोदामात हलविलेला नाही. त्यामुळे बाजार समितीतील यार्ड व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचा ठोका वाढला आहे. पाऊस आल्यास उघड्यावर असलेली ही तूर भिजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने हालचाली करून तूर खरेदीचा गुंता सोडवावा, अशी तमाम शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे. (शहर वार्ताहर)