शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बंदी भागाच्या नशिबी मरण यातना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST

अविनाश खंदारे फोटो उमरखेड : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुक्यातील बंदी भाग दुर्लक्षित आहे. पैनगंगा अभयारण्य परिसरातील जवळपास ५० गावे ...

अविनाश खंदारे

फोटो

उमरखेड : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुक्यातील बंदी भाग दुर्लक्षित आहे. पैनगंगा अभयारण्य परिसरातील जवळपास ५० गावे अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते, आरोग्य आदी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंताेष खदखदत आहे.

तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. याच भागातील पैनगंगा अभयारण्य परिसरात तब्बल ५० गावे आहेत. मात्र अभयारण्याच्या नावाखाली या गावातील नागरिकांची उपेक्षा होत आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही त्यांच्या नशिबी उपेक्षा कायमच आहे. नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील गावांच्या विकासाकरिता शासन व प्रशासनाने आतापर्यंत कोणतेही धोरणात्मक कार्यक्रम आखले नाही. परिणामी अभयारण्य परिसरातील गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाही. जे रस्ते आहेत, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामुळे बहुतांश गावांचा पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटतो.

अभयारण्य परिसरातील नागरिकांना आरोग्यासारखी महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध होत नाही. रस्ते विकासासाठी शासनाच्या विविध योजना असताना बंदी भागातील लोकांना शहराशी जोडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात नागरिकांना पायपीट करून पाणी आणावे लागते. या भागातील अनुसूचित जातीच्या बांधवांना घर दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी सुद्धा खास तरतूद केली जात नाही.

बंदी भागात उद्योगधंदे नसल्याने अनेकांना दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागते. या भागातील वर्ग दोनच्या जमिनी नियमित करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम या परिसरात आले असता नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. पैनगंगा नदी काठावरील गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित आहे. जाचक अटींमुळे ही समस्या जटिल होत आहे.

बॉक्स

नैसर्गिक संपत्तीची लयलूट

पैनगंगा अभयारण्याचा संपूर्ण परिसर नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. त्यात वनऔषधीचा मोठा वाटा आहे. औषधीयुक्त वनस्पतींचे संवर्धन करून त्याचा प्रसार, प्रचार आवश्यक अहो. वनौषधींचे संरक्षण करून ग्रामीण वैद्यांकडून त्याचे महत्त्व समजून घेतले, तर गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र, लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने उपाययोजना करीत नाही. प्रशासनही उदासीन आहे. परिणामी वनसंपदेची मुक्त हस्ते लूट सुरू आहे.