शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
2
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
3
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
5
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
10
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
11
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
12
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
13
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
14
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
15
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
16
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
17
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
18
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
19
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
20
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बंदी भागाच्या नशिबी मरण यातना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST

अविनाश खंदारे फोटो उमरखेड : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुक्यातील बंदी भाग दुर्लक्षित आहे. पैनगंगा अभयारण्य परिसरातील जवळपास ५० गावे ...

अविनाश खंदारे

फोटो

उमरखेड : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुक्यातील बंदी भाग दुर्लक्षित आहे. पैनगंगा अभयारण्य परिसरातील जवळपास ५० गावे अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते, आरोग्य आदी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंताेष खदखदत आहे.

तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. याच भागातील पैनगंगा अभयारण्य परिसरात तब्बल ५० गावे आहेत. मात्र अभयारण्याच्या नावाखाली या गावातील नागरिकांची उपेक्षा होत आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही त्यांच्या नशिबी उपेक्षा कायमच आहे. नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील गावांच्या विकासाकरिता शासन व प्रशासनाने आतापर्यंत कोणतेही धोरणात्मक कार्यक्रम आखले नाही. परिणामी अभयारण्य परिसरातील गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाही. जे रस्ते आहेत, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामुळे बहुतांश गावांचा पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटतो.

अभयारण्य परिसरातील नागरिकांना आरोग्यासारखी महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध होत नाही. रस्ते विकासासाठी शासनाच्या विविध योजना असताना बंदी भागातील लोकांना शहराशी जोडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात नागरिकांना पायपीट करून पाणी आणावे लागते. या भागातील अनुसूचित जातीच्या बांधवांना घर दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी सुद्धा खास तरतूद केली जात नाही.

बंदी भागात उद्योगधंदे नसल्याने अनेकांना दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागते. या भागातील वर्ग दोनच्या जमिनी नियमित करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम या परिसरात आले असता नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. पैनगंगा नदी काठावरील गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित आहे. जाचक अटींमुळे ही समस्या जटिल होत आहे.

बॉक्स

नैसर्गिक संपत्तीची लयलूट

पैनगंगा अभयारण्याचा संपूर्ण परिसर नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. त्यात वनऔषधीचा मोठा वाटा आहे. औषधीयुक्त वनस्पतींचे संवर्धन करून त्याचा प्रसार, प्रचार आवश्यक अहो. वनौषधींचे संरक्षण करून ग्रामीण वैद्यांकडून त्याचे महत्त्व समजून घेतले, तर गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र, लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने उपाययोजना करीत नाही. प्रशासनही उदासीन आहे. परिणामी वनसंपदेची मुक्त हस्ते लूट सुरू आहे.