शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

झाडगावात होते घरोघरी गौरीची स्थापना

By admin | Updated: September 9, 2016 02:40 IST

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते.

महालक्ष्मीचे गाव : प्रत्येक घरी तीन दिवस असते पाहुण्यांची मांदियाळीयवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते. प्रत्येक घरी पाहुण्यांची रेलचेल असते. झाडगाव हे जेमतेम चार हजार लोकवस्तीच गावं. गावात जवळपास साडेसातशे घराची वस्ती. मात्र त्यापैकी तब्बल ३०० च्यावर घरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते, हेच या गावाचे वैशिष्ट्य. दर एका घराआड या गावात गौरींची विधीवत स्थापना केली जाते. विशेष म्हणजे एकच आडनाव असलेल्या अनेक घरी गौरींची स्थापना केली जाते. गौरी स्थापना, पूजन आणि गौरी विसर्जन, या तीन दिवस गावात अक्षरश: जत्रा असते. घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. ज्यांच्या घरी महालक्ष्मींची स्थापना होत नाही, त्यांच्या घरच्या लेकी-सुनांसह आप्तस्वकीयही यावेळी गावात पोहोचतात.तीन दिवस गावात पाहुण्यांची रेलचेल असते. या गावातील व्यक्ती राज्यात, देशात कुठेही राहात असेल, तर ती व्यक्ती या सणाला गावात परत येते. एकवेळ दिवाळीला कुणी गावाकडे फिरकणार नाही, मात्र गौरी पूजनाला सर्वांची पावले आपोआप माघारी फिरतात. ग्रामस्थांचे आप्तेष्ट, मित्र यांचीही गावात वर्दळ असते. गौरी जेवणाच्या दिवशी तर गावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावात जेवणासाठी माणूस मिळणेही कठीण होते. एका-एका व्यक्तीला चार-चार घरचे आवतन असते. तरीही प्रसाद म्हणून ‘आंबील’ ग्रहण करण्यासाठी चढाओढ सुरू असते. गेल्या कित्येक वर्षांपासून झाडगावात थाटात गौरींची आगमन होते. दुसऱ्या पूजन आणि तिसऱ्या दिवशी विजर्सन होते. गावात विविध धर्मीयांचे वास्तव्य आहे. मात्र आजपर्यंत या सणाला कधीही गालबोट लागले नाही. एकोप्याने हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे मुस्लीम समाजातील वृद्ध महिला बांगड्यांचा व्यवसाय करते. त्या वृद्धेच्या कोऱ्या बांगड्या अनेक घरांतील महालक्ष्मींच्या हातात घातल्या जातात. एकूणच अत्यंत आनंदाने आणि एकमेकांच्या भावना जोपासात सर्वधर्मीय बांधव हा गौरी उत्सव साजरा करतात. त्यातून गावात सामाजिक सलोखा कायम राहण्यास सैदव मदत होत आहे. (शहर प्रतिनिधी)तीन दिवस दिवाळीचेझाडगावात गौरी पूजनाच्या तीन दिवसांत दिवाळीचा भास होतो. एकवेळ दिवाळीला गावात एवढी गर्दी आणि रेलचेल दिसणार नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यात व जिल्ह्यातही झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. अनेक घरी तर केल्या १५0 वर्षांपासून व त्यापूर्वीपासूनही गौरींचे स्थापना केली जात आहे. त्यामुळेच गौरी पूजनाला या गावात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या आधुनिक आणि विज्ञानवादी युगातही या गावात हा धार्मिक सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे.