शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

मजीप्राच्या १०८ अधिकाऱ्यांची चाैकशी; नऊ महिन्यांत केवळ सात प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 13:01 IST

कुठलीही चाैकशी प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे; परंतु ‘मजीप्रा’त पाच ते सहा वर्षे प्रकरण रेंगाळत ठेवले जात आहे.

विलास गावंडे

यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील १०८ अधिकाऱ्यांची विविध कारणांसाठी चाैकशी केली जात आहे. चाैकशीच्या नावाखाली त्यांचे विविध आर्थिक लाभ अडवून ठेवण्यात आले आहे. कुठलीही चाैकशी प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे; परंतु ‘मजीप्रा’त पाच ते सहा वर्षे प्रकरण रेंगाळत ठेवले जात आहे.

कामामध्ये अनियमितता, मध्यवर्ती कार्यालयाची परवानगी न घेता करण्यात आलेली कामे, आदी कारणांवरून या अधिकाऱ्यांच्या मागे मागील काही वर्षांत चाैकशीचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चाैकशीसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आस्थापना व दक्षता विभागाच्या माध्यमातून चाैकशी प्रकरणे हाताळली जात आहे.

मागील नऊ महिन्यांत केवळ सात प्रकरणांची चाैकशी पूर्ण करून निकाल देण्यात आला आहे. एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत पाच प्रकरणांचा साेक्षमोक्ष लावण्यात आला. जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या प्रत्येकी दोन तिमाहीमध्ये प्रत्येकी एक प्रकरण निकाली काढण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत निकालाची सुरुवातही झालेली नाही.

चाैकशीच्या नावाखाली प्रकरणे अडकवून ठेवली जात असल्याने सेवानिवृत्तांचे मोठे हाल होत आहेत. चाैकशीचे एक प्रकरण आठ ते दहा टेबलवर फिरते. काही अधिकारी गंभीर आजाराने पीडित आहेत. त्यांना विभागाकडून १० ते १५ लाख रुपये घेणे आहे. शिस्त व अपिलाच्या नावाखाली होणारी चाैकशी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितामध्ये खोडा ठरत आहे. काही अधिकाऱ्यांसाठी लोकहितासाठी स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय त्यांच्या अंगलट आले आहेत.

‘मजीप्रा’ला व्याजाचा भुर्दंड

चाैकशी प्रकरणे निकाली निघण्यास विलंब होत असल्याने अधिकारी न्यायालयात जातात. कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यास देय रक्कम सव्याज द्यावी लागते. याचा भुर्दंड ‘मजीप्रा’वर बसतो. याशिवाय विभागाची पर्यायाने सरकारीची नामुष्की होते. चाैकशीसाठी नेमलेले अधिकारी, त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी यांच्यावर वर्षाकाठी ६० ते ७० लाख रुपये खर्ची पडतात, ते वेगळेच.

चाैकशी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. आठ ते दहा वर्षे चाैकशीच सुरू राहते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांच्या आत प्रकरणे निकाली निघाली पाहिजेत.

- आर. एन. विठाळकर, सरचिटणीस, मजीप्रा सेवानिवृत्त संघ.

टॅग्स :Maharahtra Jivan Pradhikaranमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणGovernmentसरकार