शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘पेसा’ गावांमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 23, 2016 00:14 IST

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे.

किशोर तिवारी : पेसा कायद्यांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा, गावकऱ्यांनी पेसा कायदा समजून घ्यावा यवतमाळ : पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे. गावांनी हा कायदा समजून घेणे आवश्यक आहे. दारुबंदीसाठी गावांना थेट निर्णय घेण्याची सुविधा कायद्यात आहे. या कायद्यातील तरतुदीचा लाभ घेत पेसा गावांमध्ये पूर्णपणे दारुबंदीची अंमलबजावणी करा, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन निमशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेसा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सहा तालुक्यांतील १६४ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन पांढरकवडा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष वंदना राय, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय अधिकारी दीपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर, पंचायत समिती सभापती मल्लारेड्डी पानजवार, उपसभापती रेणुका गेडाम, पंचायत समिती सदस्य रितेश परचाके, सुभाष राठोड, सविता तेलंगे आदी उपस्थित होते. तिवारी म्हणाले, पेसा गावांना कायद्याने अनेक अधिकार बहाल केले आहेत. अनेक निर्णय ग्रामपंचायती स्वत: घेवून त्यांची अंमलबजावणी करु शकतात. शासन किंवा वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेण्याची आवश्यकता या गावांना नाही. त्यामुळे गावांनी आपल्या विकासासाठी या कायद्याचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी दारुबंदीचा विषय उपस्थित केल्यानंतर दारुबंदीसाठी गावे स्वत:च निर्णय घेवू शकतात. पेसा गावांनी दारुबंदीचे ठराव घेवून दारुबंदी करावी, असे आवाहन तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या उत्कृष्ठ अंमलबजावणीसाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे समित्यांचे गठण होणे आवश्यक आहे. या गावांनी अशा सर्व समित्या तातडीने गठित कराव्यात. कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करावा, कायद्यांतर्गत गौण खनिज आणि नैसर्गिक साधन-संपत्तीवर थेट मालकी हक्क देण्यात आला आहे. यातून गावाकऱ्यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन गावाचा विकास साधावा. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कायद्यातील तरतुदी आणि गावकऱ्यांना असलेले अधिकार यावर प्रकाश टाकला. पेसा कायद्याने गावांना स्वायत्त संस्था बनविली आहे. आपल्या विकासाचे सर्व निर्णय स्वत: घेवून त्यावर अंमलबजावणी करण्याचा मोठा अधिकार या कायद्याने गावाकऱ्यांना दिला आहे. त्याचा उपयोग करत पेसा गावांनी आपले गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आदर्श बनवावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आदी मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. पांढरकवडा येथे झालेल्या या कार्यशाळेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पेसा कायद्याची सविस्तर माहिती आणि गावकऱ्यांच्या अधिकाराबाबत संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस १६४ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)