शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘पेसा’ गावांमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 23, 2016 00:14 IST

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे.

किशोर तिवारी : पेसा कायद्यांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा, गावकऱ्यांनी पेसा कायदा समजून घ्यावा यवतमाळ : पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे. गावांनी हा कायदा समजून घेणे आवश्यक आहे. दारुबंदीसाठी गावांना थेट निर्णय घेण्याची सुविधा कायद्यात आहे. या कायद्यातील तरतुदीचा लाभ घेत पेसा गावांमध्ये पूर्णपणे दारुबंदीची अंमलबजावणी करा, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन निमशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेसा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सहा तालुक्यांतील १६४ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन पांढरकवडा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष वंदना राय, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय अधिकारी दीपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर, पंचायत समिती सभापती मल्लारेड्डी पानजवार, उपसभापती रेणुका गेडाम, पंचायत समिती सदस्य रितेश परचाके, सुभाष राठोड, सविता तेलंगे आदी उपस्थित होते. तिवारी म्हणाले, पेसा गावांना कायद्याने अनेक अधिकार बहाल केले आहेत. अनेक निर्णय ग्रामपंचायती स्वत: घेवून त्यांची अंमलबजावणी करु शकतात. शासन किंवा वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेण्याची आवश्यकता या गावांना नाही. त्यामुळे गावांनी आपल्या विकासासाठी या कायद्याचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी दारुबंदीचा विषय उपस्थित केल्यानंतर दारुबंदीसाठी गावे स्वत:च निर्णय घेवू शकतात. पेसा गावांनी दारुबंदीचे ठराव घेवून दारुबंदी करावी, असे आवाहन तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या उत्कृष्ठ अंमलबजावणीसाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे समित्यांचे गठण होणे आवश्यक आहे. या गावांनी अशा सर्व समित्या तातडीने गठित कराव्यात. कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करावा, कायद्यांतर्गत गौण खनिज आणि नैसर्गिक साधन-संपत्तीवर थेट मालकी हक्क देण्यात आला आहे. यातून गावाकऱ्यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन गावाचा विकास साधावा. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कायद्यातील तरतुदी आणि गावकऱ्यांना असलेले अधिकार यावर प्रकाश टाकला. पेसा कायद्याने गावांना स्वायत्त संस्था बनविली आहे. आपल्या विकासाचे सर्व निर्णय स्वत: घेवून त्यावर अंमलबजावणी करण्याचा मोठा अधिकार या कायद्याने गावाकऱ्यांना दिला आहे. त्याचा उपयोग करत पेसा गावांनी आपले गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आदर्श बनवावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आदी मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. पांढरकवडा येथे झालेल्या या कार्यशाळेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पेसा कायद्याची सविस्तर माहिती आणि गावकऱ्यांच्या अधिकाराबाबत संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस १६४ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)