शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपवा

By admin | Updated: April 12, 2017 00:09 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली.

श्रीपाल सबनिस : पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प, श्रोत्यांचा प्रतिसाद पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली. राज्यघटनेत सर्वांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे संपूर्ण जग प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्यांच्या बौद्धीक विकास हा उदारमतवादी राष्ट्रांमध्ये झाला. धर्म हा न्याय देणारा व दु:खातून मुक्त करणारा असतो. मात्र हिंदू धर्माने बाबासाहेबांना छळले. भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले. पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनातील ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.आशीष देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, डॉ.उत्तम खांबाळकर, मिलिंद दहेकर, ललिता सबनिस, डॉ.राजेश गाढवे, गोवर्धन मोहिते, प्रमोद सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समितीचे मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, अनिल हट्टेकर, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, विलास खडसे, समाधान केवटे, रामदास कांबळे, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, अशोक वाहुळे, भगवान हनवते, भारत अंभोरे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)