शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपवा

By admin | Updated: April 12, 2017 00:09 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली.

श्रीपाल सबनिस : पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प, श्रोत्यांचा प्रतिसाद पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली. राज्यघटनेत सर्वांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे संपूर्ण जग प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्यांच्या बौद्धीक विकास हा उदारमतवादी राष्ट्रांमध्ये झाला. धर्म हा न्याय देणारा व दु:खातून मुक्त करणारा असतो. मात्र हिंदू धर्माने बाबासाहेबांना छळले. भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले. पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनातील ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.आशीष देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, डॉ.उत्तम खांबाळकर, मिलिंद दहेकर, ललिता सबनिस, डॉ.राजेश गाढवे, गोवर्धन मोहिते, प्रमोद सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समितीचे मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, अनिल हट्टेकर, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, विलास खडसे, समाधान केवटे, रामदास कांबळे, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, अशोक वाहुळे, भगवान हनवते, भारत अंभोरे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)