शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अकरावी प्रवेशाची चिंता : क्षमता २५ हजार, उत्तीर्ण विद्यार्थी ३१ हजार

By admin | Updated: June 18, 2014 00:26 IST

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे.

यवतमाळ : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे. आता ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने हा ताळमेळ जुळविण्याची कसरत शिक्षण विभागाला करावी लागणार आहे. जिल्ह्यात ११ वीच्या सर्व शाखा मिळून ४६६ तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये २५ हजार ६५१ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. २०१३-१४ च्या शैक्षणिक सत्रातील ही आकडेवारी आहे. शिक्षण विभागाने यावर्षीसाठी अद्यापही नियोजन केलेले नाही. १८ जून रोजी अभ्यंकर महाविद्यालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील उच्च माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक, माध्यमिक विद्यालयांशी संलग्नीत प्राचार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. येथे ११ वी प्रवेशाचा तिढा सोडविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या आदेशापर्यंत प्राचार्यांनी निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे आगाऊ सूचनाही देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ११ वीच्या तुकड्यातील विद्यार्थी संख्येत वाढ करून तोडगा काढला जातो की आणखी इतर उपाय केले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शासनाकडून नवीन तुकड्यांचे नियोजन शिक्षण विभागाला आलेले नाही. जुन्याच पद्धतीने विद्यार्थी रचना राहणार आहे. उच्च माध्यमिक महाविद्यालयातील ११ वीच्या तुकडीमध्ये ६० विद्यार्थी ठेवण्याची मर्यादा आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीमध्ये ८० विद्यार्थी आणि माध्यमिक विद्यालयाशी संलग्नीत असलेल्या तुकड्यांमध्ये एका वर्गात १०० विद्यार्थी ठेवण्याची मर्यादा आहे. आता यात फेरबदल केला जातो काय हेही महत्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी असलेल्या क्षमतेपेक्षा पाच हजार ३८९ विद्यार्थी अतिरिक्त ठरत आहेत. जिल्ह्यात सध्या वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नीत ११ वीच्या १५ तुकड्या आहे. माध्यमिक शाळेत संलग्नीत ८०, स्वतंत्र महाविद्यालयात सात, जिल्हा परिषद शाळांशी संलग्नीत तीन, नगर परिषद शाळांशी संलग्नीत दोन, माजी शासकीय विद्यालयांशी संलग्नीत पाच, आदिवासी विकास आश्रमशाळांशी संलग्नीत १५ यानंतर कायम विनाअनुदानित तत्वावरच्या वरिष्ठ महाविद्यालयात दोन, खासगी माध्यमिक शाळेत ९५, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय ५० अशा ११ वीच्या तुकड्या आहेत. शिक्षण विभागाच्या नियोजनानंतरही चांगल्या महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ राहणार आहे.