शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अकरावी प्रवेशाचा तीढा सुटला

By admin | Updated: June 28, 2014 23:48 IST

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना

विद्यार्थी क्षमता वाढली : १३ जुलैपर्यंत चालणार प्रवेश प्रक्रियायवतमाळ : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचना दिल्या. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा हा मागील वर्षी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पाच हजार ३८९ विद्यार्थी अधिक आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी तुकड्यांमधील क्षमता वाढविण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश देता येईल एवढी व्यवस्था केल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा, सर्व कंटक मंडळांनी चालविलेले उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांची अकरावी प्रवेशाची विद्यार्थी क्षमता ३४ हजार इतकी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात कला शाखेच्या २७५ तुकड्या असून १८ हजार ७२० विद्यार्थी क्षमता, विज्ञान शाखेच्या ११९ तुकड्या असून आठ हजार १४० विद्यार्थी क्षमता, वाणिज्य शाखेच्या २२ तुकड्या असून एक हजार ७४० विद्यार्थी क्षमता तसेच संयुक्त शाखेच्या १५ तुकड्या असून एक हजार २६० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. २०१३-१४ च्या शैक्षणिक सत्रात अकरावीच्या या तुकड्यांमध्ये २५ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्याहीवेळेस विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाकरिता जागा उपलब्ध होती. आता तर प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.जी. वसावे यांनी संयुक्त बैठक घेवून अकरावी प्रवेशाचे नियोजन केले आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया १३ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या प्रक्रियेत अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांसाठी गोदणी मार्गावर असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे प्रभारी शिक्षणाधिकारी एस.जी. वसावे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)