शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

महागावात वीज, पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST

महागाव : तालुक्याचा प्रशासकीय कारभार रामभरोसे चालत आहे. प्रशासन झोपेचं सोंग घेऊन पगाराचे धनी बनले आहे. दुसरीकडे जनता वीज, ...

महागाव : तालुक्याचा प्रशासकीय कारभार रामभरोसे चालत आहे. प्रशासन झोपेचं सोंग घेऊन पगाराचे धनी बनले आहे. दुसरीकडे जनता वीज, पाण्यासाठी टाहो फोडत आहे.

येथील अपवाद वगळता प्रमुख कार्यालयाचे अधिकारी अप-डाउनमध्ये वेळ घालवत आहे. परिणामी तालुक्यातील जनतेला पूर्णवेळ वीज मिळत नाही. सर्व योजना आणि जनतेला पाणी मिळत नाही. रात्री शहरात काळोख असतो. त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. वीज, पाणी, आरोग्य सेवा कोणत्याही अडथळ्याविना नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुख्याधिकारी व त्यांच्या यंत्रणेची आहे. परंतु मुख्याधिकारी मुख्यालयी न राहता उमरखेडवरून कारभार हाकतात. गेल्या कित्येक महिन्यापासून ते गैरहजर होते.

शहरात समस्या निर्माण झालेल्या असताना आणि संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांची भूमिका उदासीन आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनतेला पाणी आणि विजेअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोविड सेंटरसारख्या ठिकाणी दोन-दोन, तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावरून शहरातील अन्य जनतेचे हाल काय असतील, हे सहज लक्षात येते.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

येथील नगरपंचायतीवर प्रशासक राज आहे. प्रशासक स्वप्नील कापडणीस अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी थोडे जरी लक्ष दिले तरी नगरपंचायतीची यंत्रणा एका सुतात काम करेल, अशी खात्री येथील नागरिकांना आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा मागोवा घेतल्यास बरीच अनियमितता त्यांच्या निदर्शनास आल्याशिवाय राहणार नाही.