शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

दोन साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा

अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव : थकीत कर्जाबाबत निर्णय होणार मुकेश इंगोले - दारव्हा अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय येणे आणि थकीत कर्जाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आर्थिक डबघाईस आलेले हे दोन्ही कारखाने अवसायनात येऊन बंद पडले. त्यानंतर दोन्ही कारखाने भाडे तत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. वारणा समूहाने दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर घेतले. मात्र करार मोडीत काढत कारखाना बंद केला. त्यामुळे जयकिसान सहकारी साखर कारखाना २०१० पासून बंद आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्हे आणि सहा तालुके आहेत. दोन्ही कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादक कामगार, कर्मचारी देशोधडीला लागले आहे. कारखान्याची मालमत्ताही चोरीस जात आहे. अशा स्थितीत सदर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. विदर्भातील सहकारी साखार कारखाने सुरू करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह या विभागातील नेते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विनय कोरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही कारखाने भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याकडे असलेले शासकीय रकमांची वसुली लांबणीवर टाकण्यात आली. शासन थकहमीवरील कर्जाच्या परतफेडी बाबत वित्तीय संस्थांच्या स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा. तसेच थकहमी शिवाय असलेल्या कर्जाबाबत वित्तीय संस्थांशी विचार विनिमय करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याच्या अवसायकांशी चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. जयकिसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी अ‍ॅड़ शंकरराव राठोड, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, शामराव देशमुख, पंढरीनाथ सिंह, सुभाष राठोड यांनी पुढाकार घेतला आहे.