शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

दोन साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा

अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव : थकीत कर्जाबाबत निर्णय होणार मुकेश इंगोले - दारव्हा अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय येणे आणि थकीत कर्जाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आर्थिक डबघाईस आलेले हे दोन्ही कारखाने अवसायनात येऊन बंद पडले. त्यानंतर दोन्ही कारखाने भाडे तत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. वारणा समूहाने दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर घेतले. मात्र करार मोडीत काढत कारखाना बंद केला. त्यामुळे जयकिसान सहकारी साखर कारखाना २०१० पासून बंद आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्हे आणि सहा तालुके आहेत. दोन्ही कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादक कामगार, कर्मचारी देशोधडीला लागले आहे. कारखान्याची मालमत्ताही चोरीस जात आहे. अशा स्थितीत सदर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. विदर्भातील सहकारी साखार कारखाने सुरू करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह या विभागातील नेते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विनय कोरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही कारखाने भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याकडे असलेले शासकीय रकमांची वसुली लांबणीवर टाकण्यात आली. शासन थकहमीवरील कर्जाच्या परतफेडी बाबत वित्तीय संस्थांच्या स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा. तसेच थकहमी शिवाय असलेल्या कर्जाबाबत वित्तीय संस्थांशी विचार विनिमय करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याच्या अवसायकांशी चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. जयकिसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी अ‍ॅड़ शंकरराव राठोड, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, शामराव देशमुख, पंढरीनाथ सिंह, सुभाष राठोड यांनी पुढाकार घेतला आहे.