शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाण्याला अधिग्रहणाचे ‘ग्रहण’

By admin | Updated: October 25, 2015 02:30 IST

जिल्ह्यात बरसलेल्या पावसाने काही धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रबीचा हंगाम करता यावा म्हणून शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

शेतकरी अडचणीत : पाणी आरक्षणाचे वादळरूपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात बरसलेल्या पावसाने काही धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रबीचा हंगाम करता यावा म्हणून शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. या सुमारास राज्य शासनाने संकलित पाण्याचे अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील मुबलक पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यातून सध्यातरी सिंचनासाठी वापर होणार नाही, अशी गंभीर स्थिती आहे. यामुळे रबीच्या सिंचनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खोळंबण्याचा धोका आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर रबीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनातील अर्धे क्षेत्र कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामाध्यमातून गहू आणि हरभऱ्याचे पीक घेण्यात येते. त्यामुळे रबीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने कॅनॉलच्या दुरूस्तीलाही सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांनी रब्बीची वाही पूर्ण केली आहे. कॅनॉलवर अवलंबून असणारे शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही पाणी मिळाले नाही. दरवर्षी पाण्याचे नियोजन करण्याचा संपूर्ण अधिकार पाटबंधारे विभागाला असतो. पाटबंधारे विभाग रबीचे नियोजन करते. प्रकल्पातील पाणी ओलितासाठी सोडले जाते. दुष्काळी परिस्थितीेने राज्य शासनाने पाणी वापराचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहे. या पाण्याचे नियोजन सूचविण्यात आले आहे. त्याकरिता बैठक घेण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत सध्या कुठलीही बैठक झाली नाही. यामुळे प्रकल्पातून पाणी कधी सोडल्या जाईल, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे रबीचा हंगाम लांबण्याचा मोठा धोका आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये ३३० एमएम क्यूब पाणी साठा शिल्लक आहे. यामधील २६२ एमएम क्यूब जलसाठा आरक्षित करण्याचे आदेश आहे. याबाबत पाणी वापराचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. मात्र, पाणी वाटपाची बैठक झाली नाही. या विलंबाने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. सध्याच्या स्थितीत १० एमएम क्यूब पाणी खरिपाच्या पिकांसाठी सोडण्यात आले. ५ एमएम क्यूब पाणी वसाहतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. १.७२ एमएम क्यूब पाणी उद्योगासाठी आरक्षित करण्यात आले आहे.