शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

धरणातील पाण्याला अधिग्रहणाचे ‘ग्रहण’

By admin | Updated: October 25, 2015 02:30 IST

जिल्ह्यात बरसलेल्या पावसाने काही धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रबीचा हंगाम करता यावा म्हणून शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

शेतकरी अडचणीत : पाणी आरक्षणाचे वादळरूपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात बरसलेल्या पावसाने काही धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रबीचा हंगाम करता यावा म्हणून शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. या सुमारास राज्य शासनाने संकलित पाण्याचे अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील मुबलक पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यातून सध्यातरी सिंचनासाठी वापर होणार नाही, अशी गंभीर स्थिती आहे. यामुळे रबीच्या सिंचनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खोळंबण्याचा धोका आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर रबीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनातील अर्धे क्षेत्र कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामाध्यमातून गहू आणि हरभऱ्याचे पीक घेण्यात येते. त्यामुळे रबीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने कॅनॉलच्या दुरूस्तीलाही सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांनी रब्बीची वाही पूर्ण केली आहे. कॅनॉलवर अवलंबून असणारे शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही पाणी मिळाले नाही. दरवर्षी पाण्याचे नियोजन करण्याचा संपूर्ण अधिकार पाटबंधारे विभागाला असतो. पाटबंधारे विभाग रबीचे नियोजन करते. प्रकल्पातील पाणी ओलितासाठी सोडले जाते. दुष्काळी परिस्थितीेने राज्य शासनाने पाणी वापराचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहे. या पाण्याचे नियोजन सूचविण्यात आले आहे. त्याकरिता बैठक घेण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत सध्या कुठलीही बैठक झाली नाही. यामुळे प्रकल्पातून पाणी कधी सोडल्या जाईल, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे रबीचा हंगाम लांबण्याचा मोठा धोका आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये ३३० एमएम क्यूब पाणी साठा शिल्लक आहे. यामधील २६२ एमएम क्यूब जलसाठा आरक्षित करण्याचे आदेश आहे. याबाबत पाणी वापराचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. मात्र, पाणी वाटपाची बैठक झाली नाही. या विलंबाने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. सध्याच्या स्थितीत १० एमएम क्यूब पाणी खरिपाच्या पिकांसाठी सोडण्यात आले. ५ एमएम क्यूब पाणी वसाहतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. १.७२ एमएम क्यूब पाणी उद्योगासाठी आरक्षित करण्यात आले आहे.