शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

वर्षभरात दोन लाल दिव्यांची कमाई

By admin | Updated: December 28, 2016 00:17 IST

सन २०१६ हे वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड महत्वपूर्ण ठरले. संपूर्ण वर्षभरच अनेक राजकीय उलथापालथी झाल्या.

राजकीय उलथापालथींनी गाजले वर्ष : भाजपा-शिवसेनेची विजयी घोडदौड यवतमाळ : सन २०१६ हे वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड महत्वपूर्ण ठरले. संपूर्ण वर्षभरच अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. विशेष असे वर्षभरात जिल्ह्याने दोन लालदिवे मिळविण्याची मोठी राजकीय कामगिरी केली. वर्षभरातील राजकीय उपलब्धीची आता वर्षाअखेरीस चर्चा होताना दिसते आहे. सन २०१६ मध्ये विधान परिषद आणि नगरपरिषदांच्या झालेल्या निवडणुका आणि त्यात अपेक्षेनुसार भाजपा-शिवसेनेची विजयी घोडदौड सर्वात लक्षवेधक ठरल्या आहे. राजकीय दृष्ट्या वर्षभरात जिल्ह्याने खूप काही कमावले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पूर्वी खते व रसायने हे खाते होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या फेरबदलात अहीर यांना बढती देत त्यांच्याकडे पंतप्रधानांनी राज्यमंत्री म्हणून देशाच्या गृह खात्याची जबाबदारी सोपविली. या खात्याची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्र सरकारमध्ये गृह खात्याची जबाबदारी सांभाळण्याचा योग आला. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचा नेहमीच दबदबा राहिला आहे. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यात किमान दोन-तीन लालदिवे ठरलेले असायचे. परंतु युती सरकारमध्ये केवळ संजय राठोड यांच्या राज्यमंत्री पदाच्या निमित्ताने एकमेव दिवा जिल्ह्याला मिळाला होता. लालदिव्यांची ही कमी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चाना काही महिन्यातच पूर्णविराम देऊन जिल्ह्याला एक नव्हे तर दोन लालदिवे मिळवून दिले. यवतमाळचे भाजपाचे आमदार मदन येरावार यांची राज्यमंत्री पदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्याकडे ऊर्जा, बांधकाम, सामान्य प्रशासन या सारख्या दमदार खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली गेली. भाजपा-सेनेचे सरकार असताना काँग्रेसने विरोधी बाकावर असूनही आपली लालदिव्याची परंपरा कायम ठेवली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याला राज्य सरकारमधला तिसरा लालदिवा मिळाला. आजच्या घडीला जिल्ह्याला केंद्राचा एक व राज्याचे तीन असे चार लालदिवे लाभले आहेत. गृह राज्यमंत्री रणजित पाटील अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांचा लालदिवासुद्धा अधूनमधून जिल्ह्यात लुकलुकतो. राजीनामे आणि पक्ष बदल नगरपरिषद निवडणुकीनंतर अनेक पक्षात फेरबदल, राजीनामे, पक्षांतर सुरू झाले. भाजपाने पुसदमध्ये परंपरागत ‘बंगल्यात’ सुरूंग लावून नाईक घराण्यातील सोबर चेहरा असलेल्या निलय नाईकांना भाजपात आणले. भविष्यात त्यांच्याकडे पुसद विधानसभा, यवतमाळ-वाशिम लोकसभेचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रवादीला वणीमध्येही धक्का बसला. तेथील माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी प्रदेश सरचिटणीस संजय देरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादीतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुखांच्या गटाचेही ‘तळ्यात की मळ्यात’ सुरू आहे. त्यातच सोमवारच्या बैठकीला गैरहजर असल्याने पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे. विधान परिषद व नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून माजी आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष नेमण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी प्रचंड उफाळून आली. अद्यापही जिल्हाध्यक्षाच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. ‘आधीच आॅक्सीजनवर आणि त्यात आत्महत्येची धमकी’ अशी या गटबाजीमुळे काँग्रेसची अवस्था झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)