शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

उर्ध्व पैनगंगा उमरखेडसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: February 17, 2017 02:31 IST

विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले.

कालव्यांची समस्या : शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नाहीउमरखेड : विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले. परंतु गेल्या ३० वर्षात आजही या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. उमरखेड तालुक्यासाठी उर्ध्व पैनगंगा हा प्रकल्प दिवास्वप्न ठरत आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के पाणी मराठवाड्यात जाते तर उर्वरित पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यात येते. या प्रकल्पातून समृद्धी येईल, अशी अपेक्षा उमरखेड तालुक्यातील नागरिकांना होती. परंतु हा प्रकल्पच आता अभिशाप ठरत आहे. उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी पैनगंगेच पात्र कधीही कोरडे होत नव्हते. १२ ही महिने नदीपात्रात पाणी वाहात होते. परंतु पैनगंगा नदीवर धरण झाले आणि नदीचे पात्र कोरड पडू लागले. उन्हाळा आला की, पैनगंगेचे पात्र कोरडे होत तर पावसाळ््यात अतिरिक्त पाणी सोडल्याने कृत्रिम पूर येऊन नदीतिरावरील शेकडो नागरिकांना फटका बसतो. गत ३० वर्षापासून हीच परिस्थिती कायम आहे. पैनगंगेच्या महापुराचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे उमरखेड तालुक्यात तयार करण्यात आले. परंतु कालव्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून, अनेक ठिकाणी कालवे जमीनदोस्त झाले आहे. काही ठिकाणी कालव्यातील पाणी बाहेर जाऊन अनावश्यक शेतीक्षेत्रात शिरते. त्यामुळे पाणथळ निर्माण होऊन पिकांचे नुकसान होते. कालव्याच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येतो. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने कालवे दुरूस्त झाले नाही. इसापूर धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु आजही या डाव्या कालव्यातून पाणी मिळत नाही. कंत्राटदार, अधिकारी आणि मध्यस्थांनी या कालव्याची पूर्णत: वाट लावली आहे. १९ हजार हेक्टर सिंचन क्षमता असताना अद्यापही पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून ओलित करता आले नाही. इसापूर येथील प्रकल्पातून पाणी सोडण्यातही दुजाभाव होत असल्याची कायम ओरड असते. या कालव्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेऊन उमरखेड तालुका सुजलाम, सुफलाम करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे. (कार्यालय चमू)