शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उर्ध्व पैनगंगा उमरखेडसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: February 17, 2017 02:31 IST

विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले.

कालव्यांची समस्या : शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नाहीउमरखेड : विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले. परंतु गेल्या ३० वर्षात आजही या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. उमरखेड तालुक्यासाठी उर्ध्व पैनगंगा हा प्रकल्प दिवास्वप्न ठरत आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के पाणी मराठवाड्यात जाते तर उर्वरित पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यात येते. या प्रकल्पातून समृद्धी येईल, अशी अपेक्षा उमरखेड तालुक्यातील नागरिकांना होती. परंतु हा प्रकल्पच आता अभिशाप ठरत आहे. उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी पैनगंगेच पात्र कधीही कोरडे होत नव्हते. १२ ही महिने नदीपात्रात पाणी वाहात होते. परंतु पैनगंगा नदीवर धरण झाले आणि नदीचे पात्र कोरड पडू लागले. उन्हाळा आला की, पैनगंगेचे पात्र कोरडे होत तर पावसाळ््यात अतिरिक्त पाणी सोडल्याने कृत्रिम पूर येऊन नदीतिरावरील शेकडो नागरिकांना फटका बसतो. गत ३० वर्षापासून हीच परिस्थिती कायम आहे. पैनगंगेच्या महापुराचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे उमरखेड तालुक्यात तयार करण्यात आले. परंतु कालव्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून, अनेक ठिकाणी कालवे जमीनदोस्त झाले आहे. काही ठिकाणी कालव्यातील पाणी बाहेर जाऊन अनावश्यक शेतीक्षेत्रात शिरते. त्यामुळे पाणथळ निर्माण होऊन पिकांचे नुकसान होते. कालव्याच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येतो. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने कालवे दुरूस्त झाले नाही. इसापूर धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु आजही या डाव्या कालव्यातून पाणी मिळत नाही. कंत्राटदार, अधिकारी आणि मध्यस्थांनी या कालव्याची पूर्णत: वाट लावली आहे. १९ हजार हेक्टर सिंचन क्षमता असताना अद्यापही पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून ओलित करता आले नाही. इसापूर येथील प्रकल्पातून पाणी सोडण्यातही दुजाभाव होत असल्याची कायम ओरड असते. या कालव्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेऊन उमरखेड तालुका सुजलाम, सुफलाम करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे. (कार्यालय चमू)