शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

उर्ध्व पैनगंगा उमरखेडसाठी दिवास्वप्न

By admin | Updated: February 17, 2017 02:31 IST

विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले.

कालव्यांची समस्या : शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नाहीउमरखेड : विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले. परंतु गेल्या ३० वर्षात आजही या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. उमरखेड तालुक्यासाठी उर्ध्व पैनगंगा हा प्रकल्प दिवास्वप्न ठरत आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के पाणी मराठवाड्यात जाते तर उर्वरित पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यात येते. या प्रकल्पातून समृद्धी येईल, अशी अपेक्षा उमरखेड तालुक्यातील नागरिकांना होती. परंतु हा प्रकल्पच आता अभिशाप ठरत आहे. उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी पैनगंगेच पात्र कधीही कोरडे होत नव्हते. १२ ही महिने नदीपात्रात पाणी वाहात होते. परंतु पैनगंगा नदीवर धरण झाले आणि नदीचे पात्र कोरड पडू लागले. उन्हाळा आला की, पैनगंगेचे पात्र कोरडे होत तर पावसाळ््यात अतिरिक्त पाणी सोडल्याने कृत्रिम पूर येऊन नदीतिरावरील शेकडो नागरिकांना फटका बसतो. गत ३० वर्षापासून हीच परिस्थिती कायम आहे. पैनगंगेच्या महापुराचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे उमरखेड तालुक्यात तयार करण्यात आले. परंतु कालव्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून, अनेक ठिकाणी कालवे जमीनदोस्त झाले आहे. काही ठिकाणी कालव्यातील पाणी बाहेर जाऊन अनावश्यक शेतीक्षेत्रात शिरते. त्यामुळे पाणथळ निर्माण होऊन पिकांचे नुकसान होते. कालव्याच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येतो. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने कालवे दुरूस्त झाले नाही. इसापूर धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु आजही या डाव्या कालव्यातून पाणी मिळत नाही. कंत्राटदार, अधिकारी आणि मध्यस्थांनी या कालव्याची पूर्णत: वाट लावली आहे. १९ हजार हेक्टर सिंचन क्षमता असताना अद्यापही पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून ओलित करता आले नाही. इसापूर येथील प्रकल्पातून पाणी सोडण्यातही दुजाभाव होत असल्याची कायम ओरड असते. या कालव्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेऊन उमरखेड तालुका सुजलाम, सुफलाम करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे. (कार्यालय चमू)