शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

कोरोना काळात केवळ १२५४ तरुणांना मिळाला रोजगार, तर नोंदणी सव्वालाख बेरोजगारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देजिल्हा उद्योग केंद्रातील तपशील : कौशल्य विकास खात्याचे मेळावे ठरले महत्त्वाचे

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेलेला असतानाच नवीन तरुणांना रोजगार काेठून मिळणार असा प्रश्न होता. मात्र राज्यात या काळात तब्बल दीड लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा राज्याच्या कौशल्य विकास विभागाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेतला असता १२५४ तरुणांना रोजगार मिळाल्याची बाब जिल्हा उद्योग केंद्रातून समोर आली.प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्रातील नोंदणीच्या आकडेवारीपेक्षाही जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात चार मेळावेजिल्ह्यात आतापर्यंत चार रोजगार मेळावे पार पडले. त्यात उमेदवारांचाही उत्तम प्रतिसाद होता. पूर्वीप्रमाणे आता पदभरतीसाठी आमच्याकडून याद्या न मागवता संबंधित विभाग आपल्या स्तरावर भरती करते, असे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी देशपांडे म्हणाले. तर रोजगारांच्या नोंदी आणि मेळावे याबाबत विभागाचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वैशाली पवार यांनी दिली.

रोजगार मेळाव्यांना प्रतिसादशासनाने महास्वयं पोर्टल सुरू करून त्यावरच बेरोजगारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात गर्दी दिसत नाही. शिवाय नोंदणीचे नूतनीकरणही पोर्टलवरच होत आहे. दरम्यान या पोर्टलच्या माध्यमातूनच रोजगार मेळावेही घेतले जात आहे. त्यात उमेदवारांसह विविध कंपन्या सहभागी होत आहेत. त्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सची सुविधा करून दिली जात आहे. मेळाव्याला उमेदवारांचा प्रतिसाद उत्तम असला तरी एकदा निवड झाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाणे, कामाचे स्वरुप याबाबत अडचणी येत आहेत.

तरूण काय म्हणतात?

शासनाने अनेक जागांसाठी फाॅर्म भरून घेतले. पण प्रत्यक्षात भरती केलेली नाही. एमपीएससी, पोलीस भरतीची परीक्षाच झाली नाही. शासनाची घोषणा खरी नाही.- सागर आडे, यवतमाळ 

मी पोलीस भरतीकरिता अर्ज भरला आहे. तयारीही केली आहे. पण अद्याप परीक्षा घेतली गेली नाही. एम्लाॅयमेंटकडे नोंदणी केली तरी प्रतिसाद मिळत नाही. म्हणून मी नोंदणीच केली नाही.- बबलू राहुत, यवतमाळ

सर्वांची परिस्थिती सारखीच आहे. मीही रेल्वेचा फाॅर्म भरला आहे. आता परीक्षेची वाट पाहत आहे. रोजगार वाढविण्यासाठी शासनाने आणखी चांगल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. नोंदणी करून उपयोग होत नाही.    - नेहा मेश्राम, यवतमाळ

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी