शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कोरोना काळात केवळ १२५४ तरुणांना मिळाला रोजगार, तर नोंदणी सव्वालाख बेरोजगारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देजिल्हा उद्योग केंद्रातील तपशील : कौशल्य विकास खात्याचे मेळावे ठरले महत्त्वाचे

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेलेला असतानाच नवीन तरुणांना रोजगार काेठून मिळणार असा प्रश्न होता. मात्र राज्यात या काळात तब्बल दीड लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा राज्याच्या कौशल्य विकास विभागाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेतला असता १२५४ तरुणांना रोजगार मिळाल्याची बाब जिल्हा उद्योग केंद्रातून समोर आली.प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्रातील नोंदणीच्या आकडेवारीपेक्षाही जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात चार मेळावेजिल्ह्यात आतापर्यंत चार रोजगार मेळावे पार पडले. त्यात उमेदवारांचाही उत्तम प्रतिसाद होता. पूर्वीप्रमाणे आता पदभरतीसाठी आमच्याकडून याद्या न मागवता संबंधित विभाग आपल्या स्तरावर भरती करते, असे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी देशपांडे म्हणाले. तर रोजगारांच्या नोंदी आणि मेळावे याबाबत विभागाचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वैशाली पवार यांनी दिली.

रोजगार मेळाव्यांना प्रतिसादशासनाने महास्वयं पोर्टल सुरू करून त्यावरच बेरोजगारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात गर्दी दिसत नाही. शिवाय नोंदणीचे नूतनीकरणही पोर्टलवरच होत आहे. दरम्यान या पोर्टलच्या माध्यमातूनच रोजगार मेळावेही घेतले जात आहे. त्यात उमेदवारांसह विविध कंपन्या सहभागी होत आहेत. त्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सची सुविधा करून दिली जात आहे. मेळाव्याला उमेदवारांचा प्रतिसाद उत्तम असला तरी एकदा निवड झाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाणे, कामाचे स्वरुप याबाबत अडचणी येत आहेत.

तरूण काय म्हणतात?

शासनाने अनेक जागांसाठी फाॅर्म भरून घेतले. पण प्रत्यक्षात भरती केलेली नाही. एमपीएससी, पोलीस भरतीची परीक्षाच झाली नाही. शासनाची घोषणा खरी नाही.- सागर आडे, यवतमाळ 

मी पोलीस भरतीकरिता अर्ज भरला आहे. तयारीही केली आहे. पण अद्याप परीक्षा घेतली गेली नाही. एम्लाॅयमेंटकडे नोंदणी केली तरी प्रतिसाद मिळत नाही. म्हणून मी नोंदणीच केली नाही.- बबलू राहुत, यवतमाळ

सर्वांची परिस्थिती सारखीच आहे. मीही रेल्वेचा फाॅर्म भरला आहे. आता परीक्षेची वाट पाहत आहे. रोजगार वाढविण्यासाठी शासनाने आणखी चांगल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. नोंदणी करून उपयोग होत नाही.    - नेहा मेश्राम, यवतमाळ

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी