शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

तलावात ‘डम्पिंग यार्ड’

By admin | Updated: February 3, 2016 02:40 IST

नगरपरिषदेकडून शहर विकासाचा बागुलबुवा केला जात असतानाच शहरातील घनकचऱ्याचे नियोजन मात्र करता आले नाही.

यवतमाळ नगरपरिषद : सफाई कंत्राटदाराची मनमानी, प्रशासनाची चुप्पीयवतमाळ : नगरपरिषदेकडून शहर विकासाचा बागुलबुवा केला जात असतानाच शहरातील घनकचऱ्याचे नियोजन मात्र करता आले नाही. मागील आठ महिन्यांपासून सावरगडचा अधिकृत कचरा डेपो बंद असल्याने शहराच्या तलावफैल भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जात आहे. येथील ऐतिहासिक तलावालाच सफाई कंत्राटदारांनी ‘डम्पिंग यार्ड’ बनविले आहे. याला नगरपरिषदेचीही मूकसंमती आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही हा प्रकार सुरू आहे.नगरपरिषदेने दोन कंत्राटदारांना स्वच्छतेचा ठेका दिला आहे. त्यासाठी महिन्याकाठी १५ लाख रुपये मोजले जाते. स्वच्छता मात्र कुठेच दिसत नाही. घंटागाडीने कचरा गोळा करून वसाहतीतील कचरा संकलन केंद्रावर टाकला जातो. तेथून तो ट्रॅक्टरद्वारे ‘डम्पींग यार्ड’मध्ये नेणे अपेक्षित आहे. मात्र खर्चाला कात्री लावण्यासाठी कंत्राटदार संकलन केंद्राहून कचराच उचलत नाही. यामुळे अनेक भागातील नागरिकांनी संकलन केंद्रच बंद केले आहे. आता धामणगाव मार्गावरील बीएसएनएल कार्यालयाच्या गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जात आहे. इतकेच नव्हे तर मेलेले प्राणीही येथेच फेकून दिले जाते. याहीपेक्षा गंभीर स्थिती शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या तलावाची झाली आहे. या तलावात कचरा आणून टाकला जातो. नंतर तो जेसीबीद्वारे दूरपर्यंत तलावात लोटून दिला जातो. पावसाळ्यात हा कचरा कुजून मोठी दुर्गंधी पसरते. आता उन्हाळा असल्याने वरवरचा कचरा पेटवून देण्यात येतो. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपये शहर स्वच्छतेवर खर्च केले जातात. प्रत्यक्षात स्वच्छतेच्या नावाखाली कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासण्याचे काम सुरू आहे, असा आरोप तलावफैल परिसरातील नागरिकांनी केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)