मुख्याधिकार्यांविरूध्दही तक्रार : महिला नगरसेविकांनी केला विनयभंगाचा आरोपदिग्रस : दिग्रस नगरपरिषदेत झालेल्या सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर नाट्यमय घटनेत मुख्याधिकार्यांनी नऊ नगरसेवकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तर महिला नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांवर विनयभंगाचा आरोप करीत पोलिसात तक्रार दिली.दिग्रस नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित होती. या सभेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि शिवसेना नगरसेविकात खडाजंगी झाली. त्यानंतर काही वेळातच मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी शिवसेना नगरसेवक, नगरसेविका आणि नगरसेविकांचे पती तसेच ५0 कार्यकर्त्यांनी सभागृहात शिरुन शिवीगाळ केली. मुख्य लिपिक दयाराम पवार याचा गळा पकडून शासकीय कर्मचार्यावर हल्ला केला. कागदपत्रे फाडली, दस्ताऐवज चोरुन नेला अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुभाषचंद्र अटल, जावेद पहेलवान, रामाकांत काळे, अशोक गावंडे, ज्योत्स्ना फिसके, मीना महिंद्रे, कल्पना देशमुख, बेबी अरगडे, रवींद्र अरगडे, दीपक फिसके, जयवंतराव देशमुख यांच्यासह ५0 जणांवर १४३, ३५३, ३७९, ५0४, २0७ कलमान्वये गुन्हे दाखल केले तर शुक्रवार ३0 मेपासून सर्व कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.तर शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांवर विनयभंगाचा आरोप केला. नगरसेविका मुख्याधिकार्यांच्या कक्षात गेल्या असता त्यांना ईल शिवीगाळ करून पाचही महिलांना धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. तूर्तास पोलिसांनी मुख्याधिकार्यांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र मुख्याधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास ३0 मे रोजी दिग्रसमध्ये मोर्चा काढून शहर बंद ठेवण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
दिग्रसच्या नऊ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: May 30, 2014 00:24 IST