शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मारेगावात पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: March 5, 2017 01:06 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे.

नागरिक हतबल : पाणी पुरविण्यास नगरपंचायत ठरली असमर्थ मारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असून शहरात पाण्याचे स्त्रोत नसल्याने पाण्याची समस्या कशी सोडवावी, या प्रश्नाने नगरपंचायत प्रशासन हतबल झाले आहे. मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३० वर्षांपूर्वी १० हजार लिटरची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीत शहरालगतच्या पिसगाव नाल्यावरील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असे. परंतु तीन किलोमीटर अंतराची नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाली. अनेक ठिकाणी पाईप फुटले. त्यामुळे दोन वर्षांपासून ही नळयोजना बंद पडली. तत्कालिन ग्रामपंचायतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील अनेक वॉर्डात बोअरवेल मारून त्यावर मोटारपंप बसवून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु शहरात खोदलेल्या बोअरवेलला पुरेसे पाणी नसल्याने आणि वीज पुरवठा चांगल्या दाबाचा होत नसल्याने अनेकदा बोअरवेलमधील मोटारपंप जळून शहरातील पाणी पुरवठा ठप्प होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतररत्र भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात आतापासूनच पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. परिणामी भूजल पातळी झपाट्याने खोल चाचली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक आठ, १५, चार, तीनसह अनेक वॉर्डात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलला पाणीच नसल्याने भविष्यात शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीचे कोणतेही साधन नाही. लोकांच्या मागणीचा रेटा पुढे केल्यानंतर नगरपंचायत प्रशासन किरायाने टँकर घेऊन पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. परंतु शहराला पाणी पुरवठा कमी आणि पाण्यासाठी नागरिकांची भांडणेच जास्त, असाच प्रकार उन्हाळाभर शहरात सुरू असतो. आता शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने १० मार्च रोजी शुक्रवारी विशेष सभा आयोजित केली आहे. सभेत नगरसेवक पाण्याची समस्या आक्रमकपणे मांडणार असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. (शहरप्रतिनिधी)