शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

व्यापाऱ्यांमुळे बाजार समितीत शेतकऱ्यांची कोंडी

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

नेहमीच आसमानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बंदने सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

 सुलतानी संकट : महसूल राज्यमंत्री घेणार बैठक, सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता यवतमाळ : नेहमीच आसमानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बंदने सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमाल खुल्या बाजारात गेल्याने खासगी व्यापाऱ्यांना लुटीची संधी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार ठप्प पडले. आधीच शेतमालास न मिळणाऱ्या योग्य दरामुळे शेतकरी संकटात आहेत. अशात व्यापाऱ्यांच्या वादाने बाजार समितीची उलाढाल बंद पडली आहे. गेल्या १२ दिवसांपासून जिल्हा मुख्यालयाच्या येथील बाजार समितीत सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांपुढील शुक्लकाष्ट संपता संपेनासे झाले आहे. मात्र कोणत्याही लोकप्रतिनीधींनी अद्याप शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. बाजार समितीचे व्यवहार ठप्प पडल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी संकटात आहे. त्यांच्या हाती पैसा नाही. त्यांच्या घरातील सर्व कार्ये रखडली आहे. यामुळे त्रस्त शेतकरी खुल्या बाजारात आपला शेतमाल विक्रीस नेत आहे. जवळ एकही पैसा नसल्याने नाईलाजाने त्यांना खुल्या बाजारात आपला शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याची ही नड ओळखून व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांना लुुटण्याची मोहिमच हाती घेतली आहे. वाट्टेल त्या दरात व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करीत आहे. संपूर्ण यंत्रणा हा तमाशा उघड्या डोळयांनी बघत आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी कुणालाही सवड नाही. यातून व्यापारी अल्पावधीतच गडगंज होत आहे. लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून सर्व प्रकार बघत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. बाजार समितीने व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. (शहर वार्ताहर) व्यापारी म्हणतात ईलेक्ट्रॉनिक काटेच हवे बाजार समितीतून बारदाना चोरीला जातो आणि माल कमी भरतो. हा प्रकार काही ओट्यांवर होतो. यामुळे व्यापाऱ्यांनी शेतमालाच्या मोजमापासाठी स्वत:च्या मालकीचे ईलेक्ट्रॉनिक काटे लावण्याची मागणी बाजार समितीकडे केली आहे. मात्र समितीने जसे आहे, त्याच परिस्थितीत मोजमाप प्रक्रिया राबविण्याची सूचना केल्याचे सभापती रवींद्र ढोक यांनी सांगितले. तूर खरेदी केंद्रांचे हाल कायमच जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू कमी अन् बंदच जादा काळ राहिले आहे. हे केंद्र सुरू असण्यापेक्षा त्याचा बंदचा काळच जादा आहे. यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. कधी बारदाना नाही, तर कधी तूर ठेवण्यासाठी जागा नाही. शेतकऱ्यांचे हाल अजूनही कायम आहेत. यानंतरही याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना उपाययोजना करण्यास वेळ नाही. शासन आणि प्रशासन दोन्ही कोडगे झाल्याने शेतकरी संतप्त आहे. आता केवळ सात दिवस हे केंद्र उघडे राहणार आहे. १५ एप्रिलपासून ते बंद होणार आहे. या सात दिवसांत खरच उर्वरित तूर खेरीद केली जाईल काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.