शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिक्रमणामुळे महागावातील रस्ते अरुंद, शुद्ध पाण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:39 IST

फोटो ग्राउंड रिपोर्ट संजय भगत महागाव : वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे ...

फोटो

ग्राउंड रिपोर्ट

संजय भगत

महागाव : वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अद्यापही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. काेट्यवधींच्या योजना राबवूनही शहराचा विकास झाला नाही. त्यामुळे विविध योजनांचे मिळालेले कोट्यवधी रुपये कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायत स्थापनेनंतर शासनाकडून नागरी सुविधांकरिता विविध योजनांखाली कोट्यवधी रुपये देण्यात आले. मात्र, अपवाद वगळता झालेल्या कामांमध्ये दर्जा राखण्यात आलेला नाही. परिणामी, शासनाचे कोट्यवधी रुपये मातीमोल झाले आहेत. शहरातील नागरिकांना अजूनही शुद्ध पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. प्रभाग क्रमांक सात हा भाग दलित वस्तीचा आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने सात कोटी रुपयांची विकास कामे करताना नियोजनामधून हा प्रभाग पूर्णपणे वगळलेला आहे.

शहरातील हमरस्त्यावर वाढते अतिक्रमण रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. वाढते अतिक्रमण वेळीच हटविण्यात यावे, अशी तमाम नागरिकांची अपेक्षा आहे; परंतु नगरपंचायत प्रशासन त्यावर कोणतीही धोरणात्मक कार्यवाही करत नसल्यामुळे शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने पाच वर्षांत कुठलेही सांगावे असे काम केलेले दिसत नाही. अपवाद तेवढा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या रस्ते, नाली विकासकामांचा सांगता येईल.

यामध्येही दर्जा नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारून कित्येक वर्षे झाली आहेत; परंतु जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला नाही. दिवसेंदिवस शहरातील वाढती लोकसंख्या, त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर अधिक भार पडत आहे. जलशुद्धीकरण केंद्राबरोबरच वाढीव पाणीपुरवठा योजनेची शहराला नितांत गरज भासू लागली आहे.

शहरामध्ये नवीन ले-आउट निर्माण झाले आहे. त्यामध्ये बिल्डर लॉबीने कोणत्याही सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. बहुतांश ले-आउट रेड झोनमध्ये तयार करण्यात आले आहेत. प्लॉटचा ताबा देऊन असे ले-आउट मालक बिल्डर लॉबी भूमिगत झाली आहे. अशा ले-आउटमध्ये नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा द्याव्या लागत आहेत. हा नाहक बोजा नगरपंचायतीच्या तिजोरीवर पडू लागला आहे.

बॉक्स

विरोधकांकडून विकासकामांत अडचणी

विकासकामे करताना विरोधकांकडून बऱ्याच अडचणी उभ्या करण्यात आल्या, असा दावा शिवसेनेचे गटनेते राजू राठोड यांनी केला. शहराला वाढीव वीजपुरवठा, गोरगरिबांना मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता भविष्यातील योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी असूनही आम्ही कधी टेंडर टाकलेले नाही. ठेकेदारी केली नाही. केवळ शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने विरोधकांना आम्ही सहकार्य केले, असा दावा केला. पुन्हा संधी मिळाल्यास भविष्यातील विकासकामे मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बॉक्स

या समस्यांकडे द्यावे लागणार लक्ष

१) कंत्राटदाराने अजूनही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे योजना नगरपंचायतीने हस्तांतरित करून घेतली नाही. ही योजना पूर्ण करून हस्तांतरित करून घेण्याकडे लक्ष द्यावे लगणार आहे.

२) वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. या सम्ययेकडे तातडीने लक्ष देणे अपेक्षित आहे. नगरपंचायतीने संबंधितांना नोटीस बजावली. आता नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे अपेक्षा आहे.

कोट

बरीच विकासकामे करायची होती; परंतु अडीच वर्षांचा कार्यकाळ फारच कमी आहे. नगराध्यक्षाला काम करण्यासाठी पूर्ण पाच वर्षे संधी द्यायला हवी. विरोधकांनी केवळ काम अडविण्याचे काम केले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये अपेक्षित विकास करता आला नाही.

-सरस्वती श्रीराम राजनकर,

नगराध्यक्ष, महागाव