शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

सात हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 28, 2014 01:21 IST

तालुक्यात १६ व १७ जूनला झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

दारव्हा : तालुक्यात १६ व १७ जूनला झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र त्यानंतर हवामानात कुठलाही बदल न झाल्यामुळे पाऊस लांबला. परिणामी सात हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. कृषी केंद्रांमधून बीटी बियाण्यांचे साडेसहा कोटी रुपये किमतीचे ७० हजार पॅकेट, साडेबारा कोटींच्या सोयाबीनच्या ५० हजार बॅग आणि २५ कोटी रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री झाली आहे. यामधून ७० टक्के कापूस व ३५ ते ४० टक्के सोयाबीनची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. या पेरण्या उलटल्यामुळे जवळपास ३५ ते ४० कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. खरीप हंगामाची चाहुल लागताच शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करून ठेवली होती. मान्सूनच्या बातम्या आल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली. १६ व १७ जूनला थोडाफार पाऊस पडला. यामुळे मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. याच वेळी कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा पेरणी केली. मात्र पाऊस गायब झाल्याने अनेकांनी गुंडाने पाणी टाकून रोपे जगविण्याचा प्रयत्न केला. नदी-नाले कोरडे झाल्यामुळे पाण्याचे स्त्रोतही आटले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही. आधीच गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व खते कसे आणावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हादरला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पावसाचा अंदाज चुकल्यामुळे पाण्यात गेले असून दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)