शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दुष्काळातील उपाययोजना थंडबस्त्यात

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली.

यवतमाळ : गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली. प्रशासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला. मात्र त्यावरील उपाययोजना अजूनही झालेल्या नाही. यावर तत्काळ कारवाई व्हावी यासह यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे, खते आणि कीटकनाशक अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.पावसाला विलंब झाल्याने वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात चारा डेपो उघडण्यात आले नाही. त्यामुळे पशुधन पालकांपुढे जनावरे सांभाळण्याची चिंता आहे. जून महिना संपत असतानाही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. १७ जूनला झालेल्या पावसामुळे ५० टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र यानंतर वरुणराजा रूसल्याने बियाणे करपले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. अशा स्थितीत त्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी कृषी विभागाने उतरविलेल्या पीक विम्याच्या रँडम पद्धतीमुळे सलग तीन वर्षे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, प्रलंबित वीज जोडण्याची कारवाई पूर्ण करावी, सिरसगाव पांढरी येथील युनियन बँकेने पीक कर्जातून कपात केलेल्या पीक विम्याच्या रकमेचा लाभ १५ वर्षांपासून मिळाला नाही तो तत्काळ द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.निवेदन सादर करताना जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, विलास बोनकिले, सदाशिवराव गावंडे, विनायकराव भेंडे, मोहन खोडके, दिलीप खडसे, रमेश रंगारी, प्रदीप भगत, विनायकराव अघम, केशव मोहरकर, नितीन भोकरे, अजिंक्य मासाळ, मनोज पवार, परशराम राठोड, अनिल चव्हाण, नितीन गुघाणे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)