शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

दुष्काळातील उपाययोजना थंडबस्त्यात

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली.

यवतमाळ : गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली. प्रशासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला. मात्र त्यावरील उपाययोजना अजूनही झालेल्या नाही. यावर तत्काळ कारवाई व्हावी यासह यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे, खते आणि कीटकनाशक अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.पावसाला विलंब झाल्याने वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात चारा डेपो उघडण्यात आले नाही. त्यामुळे पशुधन पालकांपुढे जनावरे सांभाळण्याची चिंता आहे. जून महिना संपत असतानाही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. १७ जूनला झालेल्या पावसामुळे ५० टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र यानंतर वरुणराजा रूसल्याने बियाणे करपले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. अशा स्थितीत त्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी कृषी विभागाने उतरविलेल्या पीक विम्याच्या रँडम पद्धतीमुळे सलग तीन वर्षे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, प्रलंबित वीज जोडण्याची कारवाई पूर्ण करावी, सिरसगाव पांढरी येथील युनियन बँकेने पीक कर्जातून कपात केलेल्या पीक विम्याच्या रकमेचा लाभ १५ वर्षांपासून मिळाला नाही तो तत्काळ द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.निवेदन सादर करताना जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, विलास बोनकिले, सदाशिवराव गावंडे, विनायकराव भेंडे, मोहन खोडके, दिलीप खडसे, रमेश रंगारी, प्रदीप भगत, विनायकराव अघम, केशव मोहरकर, नितीन भोकरे, अजिंक्य मासाळ, मनोज पवार, परशराम राठोड, अनिल चव्हाण, नितीन गुघाणे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)