शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने मरण झाले स्वस्त

By admin | Updated: December 21, 2014 23:07 IST

यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या

पीक हातचे गेले : पाणी नाही, पीक नाही अन् पैशाचेही वांदे, बळीराजाची शोकांतिकागणेश रांगणकर - नांदेपेरायावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांचे मार्मिक वर्णन केले आहे़ ते यावर्षी शेतकऱ्यांना तंतोतंत लागू पडत आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत़ त्यांचे सारे काही उधार, उसणवारीवर चालते. पेरणीसाठी लागणारा पैसा कुठून आणला, असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला असता अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ काही शेतकऱ्यांनी बचत गट, सोसायटीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ पेरणीच्या चाड्यावर मूठ ठेवण्यापासून ते पीक घरात येईपर्यंत, शेतकऱ्यांना जागोजागी पैसाच मोजावा लागतो़ त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचा खर्च व उत्पन्न यांचा हिशेबच जुळत नाही़पीक हाती येताच उधार, उसणवारी फेडण्यात शेतकऱ्यांची दमछाक होते. यावर्षी तर पिकानेही चांगलाच दगा दिला. कपाशी, सोयाबिनची उतारी अत्यंत कमी आली. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यातूनच शेतकरी गळ्याभोवती फास अथवा विष प्राशन करीत असल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर पडत आहे़ घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो़ भारत हा कृषी प्रधान देश म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मरणानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कुणी फिरकूनही बघत नाही़ एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मृत्यू पश्चात सरकारी मदतीसाठी पात्र, अपात्रतेच्या कसोटीला सामोरे जावे लागते. अथक परिश्रम घेऊन शेतकरी काळ्या आईची ओटी भरतो. परंतु पदी निराशाच पडते. यावर्षी खरीप, रबी हंगाम वाया गेल्याने पुढचा-मागचा हिशेब जुळायलाच तयार नाही़ शेतकऱ्यांचा डोक्यावरील खर्चाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे शेकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे़दुष्काळाची लागलेली ‘दृष्ट’ पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही त्यांच्यासमोर आ वासून उभे आहे़ काही मोजके शेतकरी शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या व्यवसायातही आता घट होत आहे. त्यामुळे हा पूरक व्यवसायही मोडीत काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे़