शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

दुष्काळाने मरण झाले स्वस्त

By admin | Updated: December 21, 2014 23:07 IST

यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या

पीक हातचे गेले : पाणी नाही, पीक नाही अन् पैशाचेही वांदे, बळीराजाची शोकांतिकागणेश रांगणकर - नांदेपेरायावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांचे मार्मिक वर्णन केले आहे़ ते यावर्षी शेतकऱ्यांना तंतोतंत लागू पडत आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत़ त्यांचे सारे काही उधार, उसणवारीवर चालते. पेरणीसाठी लागणारा पैसा कुठून आणला, असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला असता अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ काही शेतकऱ्यांनी बचत गट, सोसायटीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ पेरणीच्या चाड्यावर मूठ ठेवण्यापासून ते पीक घरात येईपर्यंत, शेतकऱ्यांना जागोजागी पैसाच मोजावा लागतो़ त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचा खर्च व उत्पन्न यांचा हिशेबच जुळत नाही़पीक हाती येताच उधार, उसणवारी फेडण्यात शेतकऱ्यांची दमछाक होते. यावर्षी तर पिकानेही चांगलाच दगा दिला. कपाशी, सोयाबिनची उतारी अत्यंत कमी आली. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यातूनच शेतकरी गळ्याभोवती फास अथवा विष प्राशन करीत असल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर पडत आहे़ घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो़ भारत हा कृषी प्रधान देश म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मरणानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कुणी फिरकूनही बघत नाही़ एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मृत्यू पश्चात सरकारी मदतीसाठी पात्र, अपात्रतेच्या कसोटीला सामोरे जावे लागते. अथक परिश्रम घेऊन शेतकरी काळ्या आईची ओटी भरतो. परंतु पदी निराशाच पडते. यावर्षी खरीप, रबी हंगाम वाया गेल्याने पुढचा-मागचा हिशेब जुळायलाच तयार नाही़ शेतकऱ्यांचा डोक्यावरील खर्चाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे शेकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे़दुष्काळाची लागलेली ‘दृष्ट’ पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही त्यांच्यासमोर आ वासून उभे आहे़ काही मोजके शेतकरी शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या व्यवसायातही आता घट होत आहे. त्यामुळे हा पूरक व्यवसायही मोडीत काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे़