शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

प्रारूप आराखडा आयुक्तांच्या दरबारात

By admin | Updated: September 14, 2016 01:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गट आणि गणांची प्रारूप रचना आयुक्तांकडे सादर करताच आता इच्छुकांचे सर्व लक्ष आयुक्तालयाकडे लागले आहे.

गट, गण रचना : ५ आॅक्टोबरला होणार चित्र स्पष्ट, इच्छुकांचे सुरू होणार डावपेचयवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गट आणि गणांची प्रारूप रचना आयुक्तांकडे सादर करताच आता इच्छुकांचे सर्व लक्ष आयुक्तालयाकडे लागले आहे. ५ आॅक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने त्याचवेळी इच्छुकांचे डावपेच सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी ६२ गट व १२४ गण होते. मात्र शहराभोवतालच्या सात ग्रामपंचायती पालिकेत समाविष्ट झाल्याने एक गट आणि दोन गण कमी झाले. आता एकूण ६१ गट आणि १२२ गण राहणार आहे. त्यात सर्वाधिक फटका यवतमाळला बसणार आहे. यवतमाळ पंचायत समितीमधील जवळपास तीन गट आणि सहा गण कमी होणार आहे. याउलट काही पंचायत समितींच्या गट आणि गणांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे यावेळची जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वार्थाने नवीन असणार आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम आहे. याच जिल्हा परिषदेने राज्याला एक मुख्यमंत्री, काही मंत्री, अनेक आमदार दिले आहे. जिल्हा परिषद सदस्यांमधून अनेक जण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी नेहमी सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून येते. यावेळीही ही चुरस कायम राहून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तथापि गट आणि गणांचे आरक्षण जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्वच मूग गिळून बसणार आहे. आरक्षणाच्या जागेसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. यात गट आणि गणांच्या रचनेचे प्रारूप तयार झाले. गट आणि गणांचे प्रवर्गनिहाय आरक्षणही त्यात दर्शविण्यात आले. येत्या २३ सप्टेंबरला आयुक्त या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. नंतर जिल्हाधिकारी ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती व सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करून ५ आॅक्टोबरला गट व गणांची आरक्षण सोडत काढणार आहे. हरकती, सूचनानंतर विभागीय ंआयुक्त १७ नोव्हेंबरला गट व गणांची अंतिम रचना जाहीर करणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)भाजप, शिवसेनेची कसोटीराज्य आणि केंद्रात भाजप व मित्रपक्षांची सत्ता असल्याने यावेळची निवडणूक भाजप, शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेवर कधीही वर्चस्व प्राप्त केले नाही. केवळ मागील अडीच वर्षात राष्ट्रवादीच्या खेळीमुळे शिवसेनेला दोन सभापती पदे मिळाली होती. सध्या जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेकडे राज्यमंत्री पद आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री सोबतीला आहे. याशिवाय वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्षही साथीला आहेत. सदर दोन्ही पक्षांना ग्रामीण भागात पाळेमुळे मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. मात्र गेली कित्येक वर्षे ग्रामीण भागावर पकड टिकवून असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत करणे वाटते तितके सोपे नाही, याची या दोनही पक्षांतील धुरीणांना चांगलीच जाणीव आहे.