शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जिल्हा बँकेचे २४ हजार शेतकरी कर्जाला मुकणार

By admin | Updated: August 29, 2016 00:53 IST

खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही.

३१ आॅगस्ट अंतिम मुदत : कर्ज पुनर्गठनासाठी हवे ६३ कोटीयवतमाळ : खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही. या दोन दिवसात शासनाकडून निधी येण्याची सूतराम शक्यता नसल्याने या शेतकऱ्यांना हक्काच्या कर्जाला मुकावे लागेल. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत तर कुणी बोलायलाही तयार नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून सुरुवातीपासूनच प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कर्ज वितरण मेळाव्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी दर १५ दिवसाला आढावा घेतला असे असतानाही १७०० कोटी रुपयांच्या उद्दीष्टांपैकी आतापर्यंत केवळ ६२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांना एक हजार ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपासून बँकांनी कर्ज वितरण थांबविले आहे. त्यात जिल्हा बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत कर्जपुनर्गठनासाठी २४ हजार शेतकरी पात्र ठरले. या सभासदांच्या कर्जपुनर्गनासाठी ६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र २८ आॅगस्टपर्यंत पैसेच पोहोचले नाही. वरिष्ठ पातळीवरही याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. अशातच कर्ज वितरणाची अंतिम मुदत ही ३१ आॅगस्ट आहे. अवघ्या दोन दिवसावर अंतिम मुदत आली असताना शेतकऱ्यांना आता कर्जाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ६३ कोटी रुपये वितरित करताना १५ टक्के वाटा राज्य शासन भरणार आहे. राज्य शासनाचा वाटा आल्यानंतर नाबार्ड ६० टक्के आणि राज्य बँक १० टक्के वाटा देते. जिल्हा बँक १० टक्के स्वनिधी देतो. परंतु राज्य शासनाने आपला वाटा अंतिम मुदत जवळ आली तरी अद्यापही जमा केला नाही. त्यामुळे इतर निधीही जिल्हा बँकेकडे वळता झाला नाही. उर्वरित दोन दिवसात ही प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून पोळ्याच्या तोंडावर तरी कर्ज मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरत आहे. आता काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.(शहर वार्ताहर)