शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
5
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
6
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
7
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
8
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
9
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
10
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
11
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
13
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
14
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
15
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
16
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
17
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
18
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
19
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
20
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त

जिल्हा बँकेचे २४ हजार शेतकरी कर्जाला मुकणार

By admin | Updated: August 29, 2016 00:53 IST

खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही.

३१ आॅगस्ट अंतिम मुदत : कर्ज पुनर्गठनासाठी हवे ६३ कोटीयवतमाळ : खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही. या दोन दिवसात शासनाकडून निधी येण्याची सूतराम शक्यता नसल्याने या शेतकऱ्यांना हक्काच्या कर्जाला मुकावे लागेल. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत तर कुणी बोलायलाही तयार नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून सुरुवातीपासूनच प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कर्ज वितरण मेळाव्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी दर १५ दिवसाला आढावा घेतला असे असतानाही १७०० कोटी रुपयांच्या उद्दीष्टांपैकी आतापर्यंत केवळ ६२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांना एक हजार ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपासून बँकांनी कर्ज वितरण थांबविले आहे. त्यात जिल्हा बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत कर्जपुनर्गठनासाठी २४ हजार शेतकरी पात्र ठरले. या सभासदांच्या कर्जपुनर्गनासाठी ६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र २८ आॅगस्टपर्यंत पैसेच पोहोचले नाही. वरिष्ठ पातळीवरही याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. अशातच कर्ज वितरणाची अंतिम मुदत ही ३१ आॅगस्ट आहे. अवघ्या दोन दिवसावर अंतिम मुदत आली असताना शेतकऱ्यांना आता कर्जाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ६३ कोटी रुपये वितरित करताना १५ टक्के वाटा राज्य शासन भरणार आहे. राज्य शासनाचा वाटा आल्यानंतर नाबार्ड ६० टक्के आणि राज्य बँक १० टक्के वाटा देते. जिल्हा बँक १० टक्के स्वनिधी देतो. परंतु राज्य शासनाने आपला वाटा अंतिम मुदत जवळ आली तरी अद्यापही जमा केला नाही. त्यामुळे इतर निधीही जिल्हा बँकेकडे वळता झाला नाही. उर्वरित दोन दिवसात ही प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून पोळ्याच्या तोंडावर तरी कर्ज मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरत आहे. आता काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.(शहर वार्ताहर)