शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे २४ हजार शेतकरी कर्जाला मुकणार

By admin | Updated: August 29, 2016 00:53 IST

खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही.

३१ आॅगस्ट अंतिम मुदत : कर्ज पुनर्गठनासाठी हवे ६३ कोटीयवतमाळ : खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही. या दोन दिवसात शासनाकडून निधी येण्याची सूतराम शक्यता नसल्याने या शेतकऱ्यांना हक्काच्या कर्जाला मुकावे लागेल. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत तर कुणी बोलायलाही तयार नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून सुरुवातीपासूनच प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कर्ज वितरण मेळाव्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी दर १५ दिवसाला आढावा घेतला असे असतानाही १७०० कोटी रुपयांच्या उद्दीष्टांपैकी आतापर्यंत केवळ ६२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांना एक हजार ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपासून बँकांनी कर्ज वितरण थांबविले आहे. त्यात जिल्हा बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत कर्जपुनर्गठनासाठी २४ हजार शेतकरी पात्र ठरले. या सभासदांच्या कर्जपुनर्गनासाठी ६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र २८ आॅगस्टपर्यंत पैसेच पोहोचले नाही. वरिष्ठ पातळीवरही याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. अशातच कर्ज वितरणाची अंतिम मुदत ही ३१ आॅगस्ट आहे. अवघ्या दोन दिवसावर अंतिम मुदत आली असताना शेतकऱ्यांना आता कर्जाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ६३ कोटी रुपये वितरित करताना १५ टक्के वाटा राज्य शासन भरणार आहे. राज्य शासनाचा वाटा आल्यानंतर नाबार्ड ६० टक्के आणि राज्य बँक १० टक्के वाटा देते. जिल्हा बँक १० टक्के स्वनिधी देतो. परंतु राज्य शासनाने आपला वाटा अंतिम मुदत जवळ आली तरी अद्यापही जमा केला नाही. त्यामुळे इतर निधीही जिल्हा बँकेकडे वळता झाला नाही. उर्वरित दोन दिवसात ही प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून पोळ्याच्या तोंडावर तरी कर्ज मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरत आहे. आता काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.(शहर वार्ताहर)