शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जिल्हा बँकेचे पीककर्ज वाटप पावणेदोनशे कोटींवर

By admin | Updated: May 28, 2017 00:47 IST

पीककर्ज वाटपात दरवर्षीच राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत आघाडीवर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने

उद्दिष्ट ४६२ कोटी : राष्ट्रीयीकृत बँकांच्या गतीवर नजरा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पीककर्ज वाटपात दरवर्षीच राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत आघाडीवर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षीसुद्धा मे संपण्यापूर्वीच पीककर्ज वाटपाचा आकडा पावणेदोनशे कोटींवर नेला आहे. जिल्हा बँकेला शासनाने यावर्षी ४६२ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. त्यातील १७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप गुरुवारपर्यंत पूर्ण झाले. जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेच्या सर्व ८२ शाखांमध्ये गर्दी होणार आहे. या काळात चलन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. तो होऊ नये म्हणून जिल्हा बँकेने आतापासूनच आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गेल्या हंगामात जिल्हा बँकेला ४२६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने ३४० कोटी रुपये कर्ज वाटप केले. त्यापैकी २३४ कोटी रुपयांच्या पीककर्जाची वसुली आतापर्यंत झाली आहे. गतवर्षीच्या कर्जातील १०६ कोटींची वसुली करण्याचे आव्हान बँकेपुढे आहे. जिल्हा बँकेचे कर्जवाटपातील आघाडी नेहमीच कायम राहिली आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांची गत मंद असते. जिल्हा प्रशासनाने अल्टीमेटम देऊनही राष्ट्रीयकृत बँका गती वाढविण्यास तयार नसल्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अर्थात या बँका रिझर्व्ह बँकेशिवाय कुणालाही जुमानत नसल्याचे सांगितले जाते. यावर्षीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरोबरीने पीककर्ज वाटप करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक सर्व दृष्टीने सोयीची असली तरी ग्रामीण भागात उपलब्ध शाखांशी गावे जोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने राष्ट्रीयकृत बँकांची पायरी चढावी लागते. शेतकऱ्यांकडे बघतात ‘कर्जबुडवे’ म्हणून राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांची अ‍ॅलर्जीच असल्याचा संतप्त सूर शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळतो. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांकडे ‘कर्जबुडवे’ म्हणून पाहात असल्याने शेतकऱ्यांना या बँकेत कर्जासाठी येरझारा माराव्या लागतात. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्ज मिळविण्यासाठीचा त्रास कमी आहे. कारण, शेतकरी सेवा सहकारी सोसायट्यांशी व या सोसायट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी ‘कनेक्ट’ आहे.