शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

शेतकऱ्यांची सर्व बाजूने अवहेलना

By admin | Updated: October 19, 2015 00:22 IST

शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणामुळे, शासनाच्या उदासीनतेमुळे व वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सट्टेबाजीचा व्यवसाय बनला आहे.

उत्पन्नात घट : शासन म्हणते आत्महत्या टाळा, मात्र भाव देण्याची तयारी नाहींवणी : शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणामुळे, शासनाच्या उदासीनतेमुळे व वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सट्टेबाजीचा व्यवसाय बनला आहे. मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची चहुबाजूंनी अवहेलनाच होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढच होत असल्याचे शासन ऐकत आहे. तरी त्यावर काहीही ठोस उपाययोजना करण्याचे सोडून केवळ सांत्वना म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या टाळा एवढाच सबुरीचा सल्ला दिला जात आहे. उत्पन्नात दरवर्षी घटच होत आहे. मालाचे भाव वाढविण्याची शासनाची मानसीकता नाही मग शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे.वणी तालुका कोळसा प्रवण असल्याने पिकांना पोषक ठरणारे वातावरण हळूहळू दुषीत होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात सतत घट होत आहे. यावर्षी सोयाबीनचा उतारा तर शेतकऱ्यांना रडवून सोडणारा आहे. एक क्विंटल बियाणे पेरून त्या जागी एक ते दीड क्विंटल सोयाबीन निघत आहे. काढणीची मजुरी, थ्रेशरचा खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात त्याने शेतात गाळलेल्या घामाची दमडीही शिल्लक राहत नाही. तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अत्यल्प आहे. यावर्षी पाऊसही अपूरा पडला. तरीही कापसाची झाडे जोमाने वाढून आली. यावर्षी कापूस शेतकऱ्यांना वाचवणार अशी स्थिती वाटत होती. मात्र मध्येच सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस आला. कापसाची झाडे लोटून पडली. अशा विषम वातावरणामुळे कापसालाही अपेक्षीत फळधारणा झाली नाही. पहिली बोंडे एकाच वेळी फुटली. त्यामुळे कापूस वेचायला मजूर मिळेनासे झाले. मजुरांची आयात सुरू झाली. एका क्विंटलला ५००-६०० रूपये वेचण्याची मजुरी द्यावी लागत आहे. एवढे चित्र डोळ्यासमोर दिसत असतानाही कापसाला भाव वाढविण्यासाठी शासनाचे पाऊल पडले नाही. एक क्विंटल कापूस विकला तर दीड किलो बियाणाची खरेदी होत नाही. खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाला चार हजाराचे आत भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच चिंतेत पडला आहे. जुने कर्ज फिटत नसल्याने बँका नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना दारात उभे ठेवत नाही. मग शेतीच्या भरवशावर संसार कसा चालवावा, असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास शासन धजावत नाही. त्यासाठी पीक परिस्थिती समाधानकारक नसतानाही आणेवारी मात्र ५० पेक्षा अधिक काढण्याची किमया शासनाचा महसूल विभाग करीत आहे. परिणामी सरकारी मदतीवरही अंकुश लागला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)