शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

तंटामुक्तीसाठी अनिष्ट प्रथांना दूर सारणे गरजेचे

By admin | Updated: May 18, 2014 23:58 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला यशस्वी करण्यासाठी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासह अनिष्ट प्रथासुद्धा बंद करणे आवश्यक आहे. ही मोहीम अधिक लोकाभिमुख करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी

 राजेश कुशवाह - आर्णी

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला यशस्वी करण्यासाठी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासह अनिष्ट प्रथासुद्धा बंद करणे आवश्यक आहे. ही मोहीम अधिक लोकाभिमुख करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे पारायण करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी महामानवांच्या विचाराचा प्रसार करणारे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तंटामुक्त अभियानाला यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर असलेले अवैध धंदे बंद करणे आवश्यक आहे. राजकीय समतोल साधावा म्हणून बर्‍याचदा अवैध धंदे करणार्‍यांना गावातूनच अभय दिल्या जाते. यामुळे तंटामुक्त अभियानाला काही प्रमाणात ब्रेक लागतो. कमी श्रमात जादा पैसा कमावण्याच्या मोहातून गावपातळीवरसुद्धा अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असतात. अवैध व्यवसायात असणार्‍या लोकांना तंटामुक्त समितीच्यावतीने योग्य मार्गदर्शन करून त्यांना या पासून परावृत्त करणे गरजेचे आहे. तसेच त्याला पर्याय रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मदतही करणे आवश्यक आहे. गावकरी व महिला बचत गटांनी एकत्र आले तर यावर प्रतिबंध बसू शकतो. परिणामी व्यसनातून अनेकांना मुक्त करता येवू शकते. ग्रामीण भागात अनिष्ट चालीरिती व अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले असते. यामुळे गावाला अधोगती प्राप्त होते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा मदत केली तर त्यांना योग्य दिशा मिळू शकते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेसारख्या ग्रंथातून समाजाला मार्गदर्शन केले. तंटामुक्तीची मूलतत्त्वे या ग्रंथामध्ये दडलेली आहे. ग्रामरक्षण या अध्यायामध्ये ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सांगण्यात आला आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांनी ग्रामगीतेचे पारायण केले तर ही मोहीम यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. राष्ट्रसंतांनी ग्रामस्वच्छता, साक्षरता, ग्रामरक्षण, ग्रामनिर्माण आदींसह विविध विषयावर ग्रामगीतेतून मार्गदर्शन केले आहे. सण, उत्सव एकत्र साजरे करून तंटामुक्त समाज निर्मितीची दिशा ग्रामगीतेतून देण्यात आली आहे. या सोबतच तंटामुक्त समित्यांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक दरी असते. ही दरी मिटवण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीच्या पदाधिकार्‍यांना पेलता आली पाहिजे. त्यासाठी महामानवांनी जे विचार सांगितले त्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. यासाठी महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करता येवू शकते. गावाला सुख आणि समृद्धीच्या वळणावर नेवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी कृतिशील होणे गरजेचे आहे. गावागावातील सुशिक्षित तरुणांवर गावाला दिशा देण्याची जबाबदारी येवून पडली आहे. तंटामुक्त ग्राम समित्यांमध्ये शिकलेल्या तरुणांचा सहभाग वाढला तर या अभियानाला निश्चितपणे गती येईल.