शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

दिग्रस शिवसेनेचा वीज वितरणाला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

दिग्रस : शहरासह तालुक्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक वैतागून गेले आहेत. थोडाही वारा व पाऊस आला की ...

दिग्रस : शहरासह तालुक्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक वैतागून गेले आहेत. थोडाही वारा व पाऊस आला की वीज गुल होते. याबद्दल शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन दिले असून समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. अन्यथ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वीज वितरण कंपनीच्या विरोधात सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. कंपनीचे गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. विजेअभावी पाणी पुरवठा यंत्रणा अपयशी ठरत आहे. नागरिकांना सुरळीत पाणी मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरात दर ५ मिनिटांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.

अनेकदा कमी, जास्त होणाऱ्या प्रवाहामुळे कित्येक नागरिकांचे वीज उपकरणे निकामी होत आहे. नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. विद्युत प्रवाहाची अशीच स्थिती राहिल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता आर.एस. बोबडे यांना निवेदन सादर केले. कंपनीने अनियमित वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, उपशहर प्रमुख राहुल देशपांडे, ललित राठोड, सुधीर भोसले, विनायक दुधे आदी उपस्थित होते.