शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र मिळविणे कठीण

By admin | Updated: June 20, 2014 00:05 IST

राज्य शासनाच्या सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळविणे आता प्रचंड कठीण झाले आहे़ आत्तापर्यंत सन १९९८-९९ च्यापूर्वी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या

जाचक अटी : शासन निर्णयामुळे तारांबळगणेश रांगणकर - नांदेपेराराज्य शासनाच्या सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळविणे आता प्रचंड कठीण झाले आहे़आत्तापर्यंत सन १९९८-९९ च्यापूर्वी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या जातीच्या उल्लेखावरून तहसीलदारांकडून नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत होते़ त्यानंतर शासनाने तहसीलदारांचे जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार काढून घेतले. हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनच जातीचे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक केले़ त्यामुळे ज्या नागरिकांनी तहसीलदारांकडून जातीचे प्रमाणपत्र मिळविले होते, ते आपोआप रद्द होऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज सादर करावे लागले़ आता नव्याने जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला आधार न मानता कागदपत्रांमध्ये मोठे बदल केले आहे. आता जातीच्या प्रमाणपत्रासाठी शासनाने इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना सन १९६७ च्या पूर्वीच्या दस्तऐवजावर जातीचा उल्लेख असेल, अशी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना १९५० च्यापूर्वीचा जातीचा परावा मागण्यात येत आहे. ज्या गावचे पुरावे जात प्रमाणपत्राच्या प्रस्तावासोबत जोडले असतील, त्याच तहसील कार्यालयातून जात प्रमाणपत्र काढण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतला आहे. यानंतर अनेकांनी जात प्रमाणपत्र मिळविले़ त्यानंतर पुन्हा शासनाने सन २00५मध्ये निर्णयात बदल करून जातीचे पुरावे कुठलेही असले तरी इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना दिलासा देत, नागरिक ज्या गावचे रहिवासी आहे, त्याच तहसीलमधून प्रमाणपत्र काढण्याबाबत निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुन्हा नागरिकांनी नवीन प्रमाणपत्रे काढली़ आता सन २०१३ मध्ये पुन्हा शासनाने जुना सन २00२ चा निर्णय पूर्ववत कायम केला आहे. आता ज्या गावातील जातीचा पुरावा असेल, त्याच तहसील कार्र्यालयातून जात प्रमाणपत्र काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखादे कुटुंब महाराष्ट्रात कुठेही नोकरीकरिता स्थायिक झालेले असते. त्यांना हे प्रमाणपत्र मिळविणे तारेवरची करसत ठरते. त्यांना मूळ गावाच्या तहसीलमध्ये जाऊन प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. शासनाच्या या बदलत्या निर्णयामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूळचा रहिवासी दाखला मिळण्यातही अडचणइतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती, जमाती या अप्रगत गटांतील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांची गरज असते़ त्यामुळे गेल्या ५० वर्षांपूर्वी मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायीक झालेल्या नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, अप्रगत गटाचे प्रमाणपत्र मिळविणे कठीण झाले आहे़ ज्या गावाचे पुरावे असतात, तेथील सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून मूळचे रहिवासी असल्याबाबत दाखला, गृह चौकशी अहवाल मागितला जातो़ तथापि ५० वर्षांपासून गाव सोडून गेलेल्या कुटुंबांना सरपंच, पोलीस पाटील ओळखत नसल्याने मूळचा रहिवासी असल्याबाबत दाखले देण्यास कचरतात.