शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

जात प्रमाणपत्र मिळविणे कठीण

By admin | Updated: June 20, 2014 00:05 IST

राज्य शासनाच्या सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळविणे आता प्रचंड कठीण झाले आहे़ आत्तापर्यंत सन १९९८-९९ च्यापूर्वी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या

जाचक अटी : शासन निर्णयामुळे तारांबळगणेश रांगणकर - नांदेपेराराज्य शासनाच्या सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळविणे आता प्रचंड कठीण झाले आहे़आत्तापर्यंत सन १९९८-९९ च्यापूर्वी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या जातीच्या उल्लेखावरून तहसीलदारांकडून नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत होते़ त्यानंतर शासनाने तहसीलदारांचे जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार काढून घेतले. हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनच जातीचे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक केले़ त्यामुळे ज्या नागरिकांनी तहसीलदारांकडून जातीचे प्रमाणपत्र मिळविले होते, ते आपोआप रद्द होऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज सादर करावे लागले़ आता नव्याने जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला आधार न मानता कागदपत्रांमध्ये मोठे बदल केले आहे. आता जातीच्या प्रमाणपत्रासाठी शासनाने इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना सन १९६७ च्या पूर्वीच्या दस्तऐवजावर जातीचा उल्लेख असेल, अशी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना १९५० च्यापूर्वीचा जातीचा परावा मागण्यात येत आहे. ज्या गावचे पुरावे जात प्रमाणपत्राच्या प्रस्तावासोबत जोडले असतील, त्याच तहसील कार्यालयातून जात प्रमाणपत्र काढण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतला आहे. यानंतर अनेकांनी जात प्रमाणपत्र मिळविले़ त्यानंतर पुन्हा शासनाने सन २00५मध्ये निर्णयात बदल करून जातीचे पुरावे कुठलेही असले तरी इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना दिलासा देत, नागरिक ज्या गावचे रहिवासी आहे, त्याच तहसीलमधून प्रमाणपत्र काढण्याबाबत निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुन्हा नागरिकांनी नवीन प्रमाणपत्रे काढली़ आता सन २०१३ मध्ये पुन्हा शासनाने जुना सन २00२ चा निर्णय पूर्ववत कायम केला आहे. आता ज्या गावातील जातीचा पुरावा असेल, त्याच तहसील कार्र्यालयातून जात प्रमाणपत्र काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखादे कुटुंब महाराष्ट्रात कुठेही नोकरीकरिता स्थायिक झालेले असते. त्यांना हे प्रमाणपत्र मिळविणे तारेवरची करसत ठरते. त्यांना मूळ गावाच्या तहसीलमध्ये जाऊन प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. शासनाच्या या बदलत्या निर्णयामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूळचा रहिवासी दाखला मिळण्यातही अडचणइतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती, जमाती या अप्रगत गटांतील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांची गरज असते़ त्यामुळे गेल्या ५० वर्षांपूर्वी मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायीक झालेल्या नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, अप्रगत गटाचे प्रमाणपत्र मिळविणे कठीण झाले आहे़ ज्या गावाचे पुरावे असतात, तेथील सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून मूळचे रहिवासी असल्याबाबत दाखला, गृह चौकशी अहवाल मागितला जातो़ तथापि ५० वर्षांपासून गाव सोडून गेलेल्या कुटुंबांना सरपंच, पोलीस पाटील ओळखत नसल्याने मूळचा रहिवासी असल्याबाबत दाखले देण्यास कचरतात.