शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तीन हजार मुली दहावी उत्तीर्ण झाल्या की नाही?

By admin | Updated: February 14, 2017 01:36 IST

मागासवर्गीय घटकातील मुलींनी आठवी-नववीनंतर शिक्षण सोडू नये, यासाठी त्यांना वार्षिक ३ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

केंद्राचा जिल्ह्याला प्रश्न : प्रोत्साहन भत्त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थिनींची शोधाशोधअविनाश साबापुरे यवतमाळ मागासवर्गीय घटकातील मुलींनी आठवी-नववीनंतर शिक्षण सोडू नये, यासाठी त्यांना वार्षिक ३ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. परंतु, गेल्या तीन शैक्षणिक सत्रातील भत्ता विद्यार्थिनींना मिळालेला नाही. अखेर भत्त्यापासून वंचित असलेल्या ३ हजार मुलींची यादी शिक्षण संचालनालयाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविली आहे. आता या मुलींची ‘अपडेट’ माहिती मिळविण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाची धावाधाव सुरू आहे.ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अनेक मुली माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नॅशनल स्किम इन्सेंटिव टू गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन’ (एनएसआयजीएसई) ही केंद्र सरकारची योजना २००८ पासून राबविली जात आहे. आठवीत असलेल्या विद्यार्थिनीने दहावीपर्यंत तरी शाळा सोडू नये, अशा पद्धतीचे योजनेचे स्वरुप आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या यादीसह शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यानंतर विद्यार्थिनीच्या नावाने तिच्याच बँक खात्यात ३ हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट केली जाते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर विद्यार्थिनीला ही रक्कम काढता येते.परंतु, ही रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात टाकताना ती विद्यार्थिनी दहावी उत्तीर्ण झाली किंवा नाही, याची माहिती ‘अपडेट’ करून द्यावी लागते. याबाबत २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांतील विद्यार्थिनींची माहितीच देण्यात आलेली नाही. या तील वर्षातील जिल्ह्यातील २९९७ मुली दहावीमध्ये शिकल्या की नाही, याची माहिती संचालनालयाकडे गेलेली नाही. त्यामुळे त्यांचा वार्षिक ३ हजारांचा भत्ताही मिळालेला नाही.आता संचालनालयाने विद्यार्थिनींची माहिती शासनाच्या पोर्टलवर आॅनलाईन भरण्यास सांगितले आहे. परंतु, तीन वर्षांपूर्वी दहावीत असलेली विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली की नाही, उत्तीर्ण झाली तर सध्या कुठे शिकत आहेत, अनुत्तीर्ण झाली तर सध्या काय करीत आहे, याचे रेकॉर्ड धुंडाळताना शाळांची दमछाक होत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत माहिती न दिल्यास ३ हजार मुली हजारो रुपयांच्या भत्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.