शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार मुली दहावी उत्तीर्ण झाल्या की नाही?

By admin | Updated: February 14, 2017 01:36 IST

मागासवर्गीय घटकातील मुलींनी आठवी-नववीनंतर शिक्षण सोडू नये, यासाठी त्यांना वार्षिक ३ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

केंद्राचा जिल्ह्याला प्रश्न : प्रोत्साहन भत्त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थिनींची शोधाशोधअविनाश साबापुरे यवतमाळ मागासवर्गीय घटकातील मुलींनी आठवी-नववीनंतर शिक्षण सोडू नये, यासाठी त्यांना वार्षिक ३ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. परंतु, गेल्या तीन शैक्षणिक सत्रातील भत्ता विद्यार्थिनींना मिळालेला नाही. अखेर भत्त्यापासून वंचित असलेल्या ३ हजार मुलींची यादी शिक्षण संचालनालयाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविली आहे. आता या मुलींची ‘अपडेट’ माहिती मिळविण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाची धावाधाव सुरू आहे.ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अनेक मुली माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नॅशनल स्किम इन्सेंटिव टू गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन’ (एनएसआयजीएसई) ही केंद्र सरकारची योजना २००८ पासून राबविली जात आहे. आठवीत असलेल्या विद्यार्थिनीने दहावीपर्यंत तरी शाळा सोडू नये, अशा पद्धतीचे योजनेचे स्वरुप आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या यादीसह शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यानंतर विद्यार्थिनीच्या नावाने तिच्याच बँक खात्यात ३ हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट केली जाते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर विद्यार्थिनीला ही रक्कम काढता येते.परंतु, ही रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात टाकताना ती विद्यार्थिनी दहावी उत्तीर्ण झाली किंवा नाही, याची माहिती ‘अपडेट’ करून द्यावी लागते. याबाबत २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या तीन वर्षांतील विद्यार्थिनींची माहितीच देण्यात आलेली नाही. या तील वर्षातील जिल्ह्यातील २९९७ मुली दहावीमध्ये शिकल्या की नाही, याची माहिती संचालनालयाकडे गेलेली नाही. त्यामुळे त्यांचा वार्षिक ३ हजारांचा भत्ताही मिळालेला नाही.आता संचालनालयाने विद्यार्थिनींची माहिती शासनाच्या पोर्टलवर आॅनलाईन भरण्यास सांगितले आहे. परंतु, तीन वर्षांपूर्वी दहावीत असलेली विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली की नाही, उत्तीर्ण झाली तर सध्या कुठे शिकत आहेत, अनुत्तीर्ण झाली तर सध्या काय करीत आहे, याचे रेकॉर्ड धुंडाळताना शाळांची दमछाक होत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत माहिती न दिल्यास ३ हजार मुली हजारो रुपयांच्या भत्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.