शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

नेर बाजार समितीत हुकूमशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:16 IST

येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकवडीमोल भावात खरेदी : नाफेडची खरेदी करण्यासाठी खविसंचा नकार

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. यातच व्यापाºयांचा माल त्यांनी अतिक्रमण करून शेतकºयांच्या जागेवर लावला. शेडमध्येही व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने शेतकरी राजाची स्थिती वाईट झाली आहे.नेर येथील बाजार समिती एकेवेळी नावाजलेली होती. नांदगाव खडेश्वर कांरजा येथील शेतकरी माल घेऊन नेर बाजार समितीत यायचे. मात्र सध्या मोठ्या शेतकºयांनी कांरजा बाजारपेठेत माल पाठवण्यावर जोर दिला आहे. नेर बाजार समितीत शेतकरी लूटल्या जात आहे. संगनमत करून मालाचे दर पाडण्यात आले आहे. विकायच असेल तर विका नाही तर चालते व्हा, या भूमिकेने शेतकरी कवडीमोल भावात माल विकत आहे. शासनाने सोयाबिनचा हमिभाव जरी घोषीत केला तरी नाफेडमार्फत खरेदी सुरू केली नाही, असा कोणताही आदेश खविसला मिळाला नाही. याचा अर्थ शासकीय खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच करून देण्याकडे कल प्रशासनाचा आहे. गरजू व गरीब शेतकºयांचे रक्त शोषन केल्या जात आहे. मागिल तूर खरेदी ईतकी उशीरा झाली की शेवटी स्वस्त दरात घेतलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच झाला. नाफेडची तूर खरेदीची जबाबदारी खविसवर आहे. परंतु पूर्ण तूर खरेदी हंगामाचे पंधरा लाख रुपये नाफेडकडे आहे. हमाली व मापारी यांचा पैसा खविसने बाजार समितीकडून साठ हजार रुपये उसनवार काढून भरला. नाफेडने अद्यापही आठ हजार ८८८ क्किंटल तुरीचा चुकारा दिला नाही. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, या अवस्थेत भीक मागून दिवाळी साजरी करण्याची वेळ प्रशासनाने गरीब शेतकºयांवर आणली आहे. आज सोयाबीनचे दर आठशे रुपये व कापसाचे दर अडीच हजार ते तीन हजार रुपये आहेत. यावर शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सभापती रवींद्र राऊत यांना कळल्यावर त्यांनी व्यापाºयांचे अतिक्रमित सोयाबिन उचलण्यास लावले. यावर त्वरीत उपाययोजना करून हुकूमशाही करणाºया व्यापाºयांना लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.नाफेड आणि खविसची भूमिका अस्पष्टसोयाबिनच्या खरेदीबाबत नाफेडने खरीदीचे पत्र खविसला दिल्याचे सांगितले, मात्र खविसला असे कोणतेही पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. तुरीचा चुकारा अजूनही बाकी आहे. खविसला कमीशनही मिळाले नाही. यामुळे पत्र आले तरी पैसे नसल्याने आम्ही खरेदी करणार नसल्याचे खविसचे सचिव देशमुख यांनी सांगितले.