शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

शेतकऱ्यांना राऊंड-अप बीटीचा विळखा

By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST

वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे.

नकली बियाणे : विदर्भाच्या पाच जिल्ह्यात रॅकेट सक्रियसंतोष अरसोड - यवतमाळ वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा या ठिकाणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाडी टाकून या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकोला या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे आणि यवतमाळ जिल्ह्यात टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे यामध्ये कमालीचे साम्य आहे. यावरून विदर्भाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात हे रॅकेट सक्रीय असल्याच्या बाबीला पुष्टी मिळत आहे.यंदा कापसाचा पेरा वाढणार आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या बियाणे व कीटकनाशकांच्या कंपन्यात काम करणाऱ्या फिल्ड असिस्टंटनी रेडी राऊंड अप हे वाण छुप्या पध्दतीने विकण्याचा सपाटा लावला. यासाठी दोन महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांशी संपर्क करण्यात आला होता. तणांचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे बरेचदा शेतीसुध्दा पडिक पडते. त्यामुळे तण नाशकाचा वापर करता येईल असे सांगत राऊंड अप बीटी वाण विकण्यात आले. ग्लायफोसेट हे तणास प्रतिबंध करणारे जिन्स रेडी राउंड अपमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे पऱ्हाटीवर तण नाशकाची फवारणी करता येते व यामुळे निंदणाचा खर्च वाचतो अशी बतावणी करीत हे वाण मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्यातच या वाणामुळे शेतात तणच उगवत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे हे महागडे व अनधिकृत बियाणे शेतकऱ्यांच्या माथी नियोजनबध्द पध्दतीने मारल्या गेले.या बियाण्याचा विदर्भाच्या पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकुळ सुरू आहे. सूर्या, आदेश आर आर, मल्लीका आर आर, सुपरतेज, बालाजी-५ अशी या बियाण्यांची नांवे आहेत. कृषी विभागाच्या कारवाईत पुसद येथे सूर्या, बाभूळगाव येथे आदेश , बालाजी- ५, पांढरकवडा येथे मल्लीका- आर आर तर दिग्रस येथे सुपरतेज बियाणे पकडण्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकाला येथील धाडीत जप्त केलेले बियाणे व यवतमाळ जिल्ह्यात जप्त केलेले बियाणे यात साम्य असल्यामुळे या रॅकेटमध्ये अनेक मोठे मासे असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा शोध घेणे हे कृषी विभागापुढील मोठे आव्हान आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. त्यातच त्यांना आता बोगस बियाण्यांचाही सामना करावा लागतो.