शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

शेतकऱ्यांना राऊंड-अप बीटीचा विळखा

By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST

वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे.

नकली बियाणे : विदर्भाच्या पाच जिल्ह्यात रॅकेट सक्रियसंतोष अरसोड - यवतमाळ वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा या ठिकाणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाडी टाकून या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकोला या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे आणि यवतमाळ जिल्ह्यात टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे यामध्ये कमालीचे साम्य आहे. यावरून विदर्भाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात हे रॅकेट सक्रीय असल्याच्या बाबीला पुष्टी मिळत आहे.यंदा कापसाचा पेरा वाढणार आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या बियाणे व कीटकनाशकांच्या कंपन्यात काम करणाऱ्या फिल्ड असिस्टंटनी रेडी राऊंड अप हे वाण छुप्या पध्दतीने विकण्याचा सपाटा लावला. यासाठी दोन महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांशी संपर्क करण्यात आला होता. तणांचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे बरेचदा शेतीसुध्दा पडिक पडते. त्यामुळे तण नाशकाचा वापर करता येईल असे सांगत राऊंड अप बीटी वाण विकण्यात आले. ग्लायफोसेट हे तणास प्रतिबंध करणारे जिन्स रेडी राउंड अपमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे पऱ्हाटीवर तण नाशकाची फवारणी करता येते व यामुळे निंदणाचा खर्च वाचतो अशी बतावणी करीत हे वाण मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्यातच या वाणामुळे शेतात तणच उगवत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे हे महागडे व अनधिकृत बियाणे शेतकऱ्यांच्या माथी नियोजनबध्द पध्दतीने मारल्या गेले.या बियाण्याचा विदर्भाच्या पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकुळ सुरू आहे. सूर्या, आदेश आर आर, मल्लीका आर आर, सुपरतेज, बालाजी-५ अशी या बियाण्यांची नांवे आहेत. कृषी विभागाच्या कारवाईत पुसद येथे सूर्या, बाभूळगाव येथे आदेश , बालाजी- ५, पांढरकवडा येथे मल्लीका- आर आर तर दिग्रस येथे सुपरतेज बियाणे पकडण्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकाला येथील धाडीत जप्त केलेले बियाणे व यवतमाळ जिल्ह्यात जप्त केलेले बियाणे यात साम्य असल्यामुळे या रॅकेटमध्ये अनेक मोठे मासे असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा शोध घेणे हे कृषी विभागापुढील मोठे आव्हान आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. त्यातच त्यांना आता बोगस बियाण्यांचाही सामना करावा लागतो.