शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

मोफत निवड होऊनही शाळेत विद्यार्थी ॲडमिशन घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

यवतमाळ : कोरोनामुळे शिक्षणाकडे खुद्द पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच आरटीईअंतर्गत राखीव जागांवर निवड होऊनही ५० टक्के पालकांनी १० ...

यवतमाळ : कोरोनामुळे शिक्षणाकडे खुद्द पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच आरटीईअंतर्गत राखीव जागांवर निवड होऊनही ५० टक्के पालकांनी १० जुलै ही अंतिम मुदत उलटल्यावरही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घेतला नाही. जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या १,२७५ जागांपैकी आतापर्यंत केवळ ८२१ जागांवर प्रवेश झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आता शासनाने प्रवेश घेण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधीच आरटीईच्या २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडतात. त्यातही निवड झाल्यावर दुर्लक्ष केले जात आहे.

कोट

यावर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे वारंवार मुदतवाढही द्यावी लागत आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने अनेक पालक आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळेशी संपर्क साधू शकले नाही. आता मात्र शाळांमध्ये शिक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पालकांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका शाळा जागा शिल्लक जागा

आर्णी १६ ०४ ३०

बाभूळगाव ०५ १९ ०५

दारव्हा ०७ १० १०

दिग्रस १० १६३ ३३

घाटंजी ०८ ३३ ३३

कळंब ०८ २८ १९

महागाव १३ ८० ०५

मारेगाव ०७ २३ १०

नेर ०६ ३५ १४

पांढरकवडा १५ ५९ १०

पुसद १६ १०६ ४१

राळेगाव ०७ ३२ ११

उमरखेड १८ १३२ ३०

वणी २१ १२३ ५३

यवतमाळ ४० २५७ ६७

झरी ०५ ११ १०