शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:58 IST

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे.

ठळक मुद्देवणीकरांचे हाल : नवरगाव धरणात केवळ ५५.३० टक्के जलसाठा, शहरावर टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे. त्यामुळे पात्रात वाळवंटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने शुक्रवारी वणी शहरातील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले.नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी टाकीत घेऊन शुद्धीकरणानंतर ते वितरीत केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वणी शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील पाणी टंचाईची नांदी समजली जात आहे. दरम्यान संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वणी नगरपालिकेच्यावतीने भुरकी (रांगणा) येथील वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे आतापासूनच अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. त्यातून वणी शहरदेखिल सुटले नाही. वणीतून वाहणाºया निर्गुडा नदीमध्ये नवरगाव धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. मात्र या धरणातही केवळ ५५.३० टक्के जलसाठा आहे. तो ६.९० दलघमी एवढा आहे. परिणामी हे पाणी केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.सन २००० पासून अशीच परिस्थिती आहे. वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाण सुरू झाल्यामुळे नदीतील कृत्रिम झरे खाणीकडे वळले. त्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदी पूर्णत: आटते. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून वणी शहरासाठी या नदीद्वारे पाणी घेतले जाते. मात्र यंदा नवरगाव धरणातच अल्प जलसाठा असल्याने भविष्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.पाचपैकी ४.४१ दलघमी पाण्याचा वापरयावर्षी वणी नगरपालिकेने नवरगाव धरणातून पाच दलघमी पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी ३१ आॅक्टोबरपर्यंत ४.४१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. उर्वरित आरक्षित जलातून २ नोव्हेंबरला ०.२० पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले आहे. वणी शहराच्या पाणी वितरणासाठी दर महिन्याला एक दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकरी याच नदीतील पाणी सिंचनासाठी मोटारपंपाद्वारे ओढतात. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याचेही बाष्पीभवन होते. परिणामी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.