शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:58 IST

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे.

ठळक मुद्देवणीकरांचे हाल : नवरगाव धरणात केवळ ५५.३० टक्के जलसाठा, शहरावर टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे. त्यामुळे पात्रात वाळवंटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने शुक्रवारी वणी शहरातील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले.नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी टाकीत घेऊन शुद्धीकरणानंतर ते वितरीत केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वणी शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील पाणी टंचाईची नांदी समजली जात आहे. दरम्यान संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वणी नगरपालिकेच्यावतीने भुरकी (रांगणा) येथील वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे आतापासूनच अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. त्यातून वणी शहरदेखिल सुटले नाही. वणीतून वाहणाºया निर्गुडा नदीमध्ये नवरगाव धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. मात्र या धरणातही केवळ ५५.३० टक्के जलसाठा आहे. तो ६.९० दलघमी एवढा आहे. परिणामी हे पाणी केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.सन २००० पासून अशीच परिस्थिती आहे. वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाण सुरू झाल्यामुळे नदीतील कृत्रिम झरे खाणीकडे वळले. त्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदी पूर्णत: आटते. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून वणी शहरासाठी या नदीद्वारे पाणी घेतले जाते. मात्र यंदा नवरगाव धरणातच अल्प जलसाठा असल्याने भविष्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.पाचपैकी ४.४१ दलघमी पाण्याचा वापरयावर्षी वणी नगरपालिकेने नवरगाव धरणातून पाच दलघमी पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी ३१ आॅक्टोबरपर्यंत ४.४१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. उर्वरित आरक्षित जलातून २ नोव्हेंबरला ०.२० पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले आहे. वणी शहराच्या पाणी वितरणासाठी दर महिन्याला एक दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकरी याच नदीतील पाणी सिंचनासाठी मोटारपंपाद्वारे ओढतात. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याचेही बाष्पीभवन होते. परिणामी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.