शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:58 IST

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे.

ठळक मुद्देवणीकरांचे हाल : नवरगाव धरणात केवळ ५५.३० टक्के जलसाठा, शहरावर टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे. त्यामुळे पात्रात वाळवंटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने शुक्रवारी वणी शहरातील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले.नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी टाकीत घेऊन शुद्धीकरणानंतर ते वितरीत केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वणी शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील पाणी टंचाईची नांदी समजली जात आहे. दरम्यान संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वणी नगरपालिकेच्यावतीने भुरकी (रांगणा) येथील वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे आतापासूनच अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. त्यातून वणी शहरदेखिल सुटले नाही. वणीतून वाहणाºया निर्गुडा नदीमध्ये नवरगाव धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. मात्र या धरणातही केवळ ५५.३० टक्के जलसाठा आहे. तो ६.९० दलघमी एवढा आहे. परिणामी हे पाणी केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.सन २००० पासून अशीच परिस्थिती आहे. वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाण सुरू झाल्यामुळे नदीतील कृत्रिम झरे खाणीकडे वळले. त्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदी पूर्णत: आटते. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून वणी शहरासाठी या नदीद्वारे पाणी घेतले जाते. मात्र यंदा नवरगाव धरणातच अल्प जलसाठा असल्याने भविष्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.पाचपैकी ४.४१ दलघमी पाण्याचा वापरयावर्षी वणी नगरपालिकेने नवरगाव धरणातून पाच दलघमी पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी ३१ आॅक्टोबरपर्यंत ४.४१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. उर्वरित आरक्षित जलातून २ नोव्हेंबरला ०.२० पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले आहे. वणी शहराच्या पाणी वितरणासाठी दर महिन्याला एक दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकरी याच नदीतील पाणी सिंचनासाठी मोटारपंपाद्वारे ओढतात. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याचेही बाष्पीभवन होते. परिणामी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.