शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पोलीस शिपायाचा मुंबईत डेंग्यूने मृत्यू

By admin | Updated: September 17, 2016 02:40 IST

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई)

गणपती बंदोबस्त : करंजी महामार्ग पथकपांढरकवडा : गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. डेंग्यू सदृश्य आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अनुपसिंह बघेल (३१) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेत यवतमाळ येथे कार्यरत असलेल्या अनुपसिंह बघेलची महिनाभरापूर्वीच १८ आॅगस्ट रोजी करंजी येथील महामार्ग पोलीस केंद्रात नियुक्ती झाली होती. याठिकाणी कर्तव्यावर असताना १२ दिवसांनीच त्याची महाराष्ट्र पोलीस केंद्र तळसने (जि.रायगड) येथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. त्यानंतर करंजी येथून ३० आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रायगड जिल्ह्यातील तळसने येथे जाण्यासाठी त्याला रवाना केल्याची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक भरत कराळे यांनी दिली. तेथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असतानाच ताणतणाव आणि वातावरणातील बदलामुळे त्याची १२ सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य आजाराने अनुपसिंहचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अनुपसिंहच्या मृत्यूची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रावर धडकताच कर्मचाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. मृत अनुपच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व जम्मू कश्मिर येथे आर्मीमध्ये सेवेत असलेले दोन भाऊ तसेच आप्त परिवार आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)