शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

वणी तालुक्यात वनांचा ऱ्हास

By admin | Updated: August 22, 2016 01:04 IST

तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़

वन विभागाची उदासीनता : वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे वनसंपदा नामशेषवणी : तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़ ही बाब तालुक्यातील जनतेला भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते, असा निसर्गप्रेमींचा कयास आहे़ मात्र वन विभागाने याकडे अजूनही गांभीर्याने बघितल्याचे दिसत नाही़अर्धशतकापूर्वी वणी तालुक्यात अनेक घनदाट जंगले होती़ त्यामध्ये शिंदोला, मेंढोली-बोरगाव, केसुर्ली-भालर, वनोजादेवी, रासा-घोन्सा, कायर-महाकालपूर, मालेगाव, पंचधार, चिलई येथील जंगले घनदाट मानली जात होती़ मात्र लाकडांचा जलतनासाठी होणारा उपयोग, शेती व इमारतीसाठी लाकडाचा वापर यासाठी सतत जंगलाची तोड होत गेली आणि जंगलांचे अस्तित्वच नष्ट होण्याची वेळ आली़ जंगलात विविध प्रकारचे प्राणी व पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती़ त्यांच्याही शिकारीत वाढ झाल्याने प्राणी, पक्षांची संख्याही नगण्यच राहिली़राज्यातील वन संपत्तीच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र वनखाते व यंत्रणा निर्माण केली. मात्र भ्रष्टाचाराच्या लोभात अडकल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरली़ चिलईच्या जंगलात मौल्यवान सागवान संपत्ती होती़ तेथे आता केवळ साग वृक्षांच्या झाडाची खुंटेच उभी दिसतात. जशी वन संपत्तीची वापरासाठी तोड झाली, तसे वृक्षारोपण व संवर्धन झाले असते, तर हा असमतोल काही प्रमाणात दूर होऊ शकला असता. वने उजाड झाल्याने या वनक्षेत्रावर अतिक्रमण करून त्याचे मोठ्या प्रमाणात शेतीत रूपांतर करण्याचा सपाटा सुरूच आहेत़ घनदाट वनांचे प्रथम झुडपी जंगलात रुपांतर झाले आहे. आता झुडपी जंगलांचे पठारात रूपांतर होऊ लागले आहे. जनतेला आता ‘रानमेवा’ मिळत नाही़ वन्यप्राण्यांना संचार करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे वन्यप्राणी आता गावांकडे धाव घेत आहे. यामध्ये गावकरी व प्राण्यांचा अनाठायी जीव जात आहे. परिणामी पर्यावरण संतुलन ढासळत आहे़ ‘ग्लोबल वार्मींग’चे संकट हा त्याचा इशारा आहे़ पर्जन्यमानात घट झाली आहे़ ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव जनतेला येत आहे़ वणी परिसरात दगडी कोळशाच्या खाणींचा पसारा वाढला आहे़ त्यामुळे प्रदूषणातील वाढ शिगेला पोहोचली आहे़ वेकोलिला प्रकल्प मंजूर करताना मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे बंधन टाकले जाते़ मात्र एकदा प्रकल्पाला मंजुरात मिळाली की वेकोलि वृक्षारोपणाच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करते, असा अनुभव प्रदूषण नियंत्रण मंडळासह जनतेलाही आला आहे़ वाढत्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ होण्याची नितांत गरज आहे़ अन्यथा या भागातील नागररिकांचे आयुष्य धोक्यात येणार आहे. अन्नासोबतच आता पाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे पाणी विक्रीचे गोरखधंदे जोरात सुरू झाले आहे़ इथपर्यंत मानवाला परवडणारे आहे़ मात्र ज्या दिवशी मानवाला ‘आॅक्सीजन’ विकत घ्यावा लागेल, त्यावेळी त्याची आयुष्यातील कमाईसुध्दा अपुरी पडणार आहे़ आॅक्सीजनचे नळकांडे पाठीवर घेऊन फिरण्याची वेळ येण्यापूर्वीच मानवाने वृक्षसंगोपणाचा विचार करणे गरजेचे आहे़ त्यासाठी वन विभागाला शस्त्रास्त्र पुरवून या विभागातील मनुष्यबळ वाढवून त्याला सक्षम बनविणे काळाची गरज झाले आहे़ अन्यथा घनदाट वन दिवसेंदिवस कमी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)