शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात वनांचा ऱ्हास

By admin | Updated: August 22, 2016 01:04 IST

तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़

वन विभागाची उदासीनता : वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे वनसंपदा नामशेषवणी : तालुक्यातील वनांचा ऱ्हास करण्याचा सपाटा वाढत आहे़ तालुक्यातील वनक्षेत्र कटाई व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात घटत आहे़ ही बाब तालुक्यातील जनतेला भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते, असा निसर्गप्रेमींचा कयास आहे़ मात्र वन विभागाने याकडे अजूनही गांभीर्याने बघितल्याचे दिसत नाही़अर्धशतकापूर्वी वणी तालुक्यात अनेक घनदाट जंगले होती़ त्यामध्ये शिंदोला, मेंढोली-बोरगाव, केसुर्ली-भालर, वनोजादेवी, रासा-घोन्सा, कायर-महाकालपूर, मालेगाव, पंचधार, चिलई येथील जंगले घनदाट मानली जात होती़ मात्र लाकडांचा जलतनासाठी होणारा उपयोग, शेती व इमारतीसाठी लाकडाचा वापर यासाठी सतत जंगलाची तोड होत गेली आणि जंगलांचे अस्तित्वच नष्ट होण्याची वेळ आली़ जंगलात विविध प्रकारचे प्राणी व पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती़ त्यांच्याही शिकारीत वाढ झाल्याने प्राणी, पक्षांची संख्याही नगण्यच राहिली़राज्यातील वन संपत्तीच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र वनखाते व यंत्रणा निर्माण केली. मात्र भ्रष्टाचाराच्या लोभात अडकल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरली़ चिलईच्या जंगलात मौल्यवान सागवान संपत्ती होती़ तेथे आता केवळ साग वृक्षांच्या झाडाची खुंटेच उभी दिसतात. जशी वन संपत्तीची वापरासाठी तोड झाली, तसे वृक्षारोपण व संवर्धन झाले असते, तर हा असमतोल काही प्रमाणात दूर होऊ शकला असता. वने उजाड झाल्याने या वनक्षेत्रावर अतिक्रमण करून त्याचे मोठ्या प्रमाणात शेतीत रूपांतर करण्याचा सपाटा सुरूच आहेत़ घनदाट वनांचे प्रथम झुडपी जंगलात रुपांतर झाले आहे. आता झुडपी जंगलांचे पठारात रूपांतर होऊ लागले आहे. जनतेला आता ‘रानमेवा’ मिळत नाही़ वन्यप्राण्यांना संचार करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे वन्यप्राणी आता गावांकडे धाव घेत आहे. यामध्ये गावकरी व प्राण्यांचा अनाठायी जीव जात आहे. परिणामी पर्यावरण संतुलन ढासळत आहे़ ‘ग्लोबल वार्मींग’चे संकट हा त्याचा इशारा आहे़ पर्जन्यमानात घट झाली आहे़ ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव जनतेला येत आहे़ वणी परिसरात दगडी कोळशाच्या खाणींचा पसारा वाढला आहे़ त्यामुळे प्रदूषणातील वाढ शिगेला पोहोचली आहे़ वेकोलिला प्रकल्प मंजूर करताना मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे बंधन टाकले जाते़ मात्र एकदा प्रकल्पाला मंजुरात मिळाली की वेकोलि वृक्षारोपणाच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करते, असा अनुभव प्रदूषण नियंत्रण मंडळासह जनतेलाही आला आहे़ वाढत्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ होण्याची नितांत गरज आहे़ अन्यथा या भागातील नागररिकांचे आयुष्य धोक्यात येणार आहे. अन्नासोबतच आता पाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे पाणी विक्रीचे गोरखधंदे जोरात सुरू झाले आहे़ इथपर्यंत मानवाला परवडणारे आहे़ मात्र ज्या दिवशी मानवाला ‘आॅक्सीजन’ विकत घ्यावा लागेल, त्यावेळी त्याची आयुष्यातील कमाईसुध्दा अपुरी पडणार आहे़ आॅक्सीजनचे नळकांडे पाठीवर घेऊन फिरण्याची वेळ येण्यापूर्वीच मानवाने वृक्षसंगोपणाचा विचार करणे गरजेचे आहे़ त्यासाठी वन विभागाला शस्त्रास्त्र पुरवून या विभागातील मनुष्यबळ वाढवून त्याला सक्षम बनविणे काळाची गरज झाले आहे़ अन्यथा घनदाट वन दिवसेंदिवस कमी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)