शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

काँग्रेस प्रवेशाचा निर्णय कार्यकर्तेच घेतील

By admin | Updated: September 5, 2015 01:30 IST

मुंबईत आपल्या खासगी कामासाठी आपण गेलो असताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा निरोप मिळाला.

मुंबईत सदिच्छा भेट : दीपक आत्राम यांनी केले स्पष्टगडचिरोली : मुंबईत आपल्या खासगी कामासाठी आपण गेलो असताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा निरोप मिळाला. त्यानुसार आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली, अशी माहिती अहेरीचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांनी दिली आहे.खा. चव्हाण यांनी आपल्याला आपण सर्वजण मिळून काँग्रेस पक्षाचे काम करू, आपण एकाच वेळी राजकारणात होतो, असेही सांगितले. त्यावर आपण काहीही हरकत नाही, असे त्यांना म्हणालो. आपल्याला काँग्रेस पक्षस्तरावर काही जबाबदाऱ्याही दिल्या जातील, असेही खा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आपण त्यांना आपल्या आदिवासी विद्यार्थी परिषदेचे अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आहेत व शेकडो कार्यकर्ते आहे. या सर्वांशी बोलून याबाबत निर्णय घेता येईल, असे सांगितले. अद्याप आपला काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. काही तरी भूमिका यापुढच्या काळासाठी निश्चित करावी लागणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी बोलून आपण याबाबत निर्णय घेऊ. ज्यावेळी निर्णय होईल, त्यावेळी त्याची माहिती आपल्या सर्वांना दिली जाईल. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असेही माजी आ. दीपक आत्राम यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमातून माजी आ. दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत वावड्या उठविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर दीपक आत्राम यांच्या या विधानाला बरेच महत्त्व राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)