शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

वजनातील तफावतीमुळे शेतकरी-व्यापाऱ्यांत वाद

By admin | Updated: January 22, 2017 00:13 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वजनात फसविण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून सातत्याने सुरू आहे.

दिग्रसमध्ये कापूस जप्त : वजन काटे घेऊन व्यापारी पळाला दिग्रस : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वजनात फसविण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून सातत्याने सुरू आहे. शनिवारी मात्र एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याची ही बनवेगिरी ओळखून चांगलाच वाद घातला. बिंग फुटल्यामुळे व्यापारी वजन काटे घेऊन पळाला. तर तहसील, पोलीस आणि बाजार समितीच्या कारवाईत तीन क्ंिवटल ९५ किलो कापूस जप्त करण्यात आला. शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारात वर्दळ होती. बाजार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. स्थानिक सहकारी जिनिंग समोरील शांतीलाल अटल यांच्या घरासमोर एक व्यापारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत होता. एका शेतकऱ्याने आपला कापूस आधीच मोजून घेतला होता. व्यापाऱ्याने कापसाचे वजन सांगितले, तेव्हा शेतकरी चक्रावून गेला. वजनामध्ये बरीच तफावत आली होती. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यामध्ये वाद पेटून व्यापाऱ्याचे बिंग फुटले. घटनास्थळावर गर्दी वाढून शहरभर चर्चा पसरली. तहसीलदार किशोर बागडे यांना माहिती मिळताच नायब तहसीलदार संजय राठोड, तलाठी नारायण हगोणे, गजानन चौधरी तसेच पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबाराव पवार, पोलीस कॉन्स्टेबल नीळकंठ चव्हाण घटनास्थळी पोहोचले. गर्दी पांगविण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना गर्दीचा फायदा घेत संबंधित व्यापारी वजन काटे घेऊन पळून गेला. मात्र कापूस तेथेच विखुरलेला होता. तर वाद घालणाऱ्या शेतकऱ्यासोबत व्यापाऱ्याने सेटींग केल्याचीही चर्चा परिसरात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमण ठाकरे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पळून जाताना व्यापाऱ्याने कापूस तेथेच सोडून दिला होता. सर्व अधिकाऱ्यांनी त्या कापसाबाबत चौकशी केली असता कोणीही समोर आले नाही. त्यामुळे शेवटी तीन क्ंिवटल ९५ किलो कापूस जप्त करण्यात आला. व सुपूर्दनाम्यावर हा कापूस शासनाच्यावतीने एका जिनिंगमध्ये ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)