शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रुंझा, नांदुराच्या धोकादायक पुलांवरून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 5, 2016 02:19 IST

दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे.

शासनाचा मनाई आदेश : तरीही ब्रिटिशकालीन पुलांनाच नागरिकांची पसंती, पोलिसांनाही जुमानत नाहीत नरेश मानकर/ आरिफ अली पांढरकवडा/बाभूळगाव दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही वाहनधारकांची याच पुलाला पसंती आहे. पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथील पुलांवरून दररोज जीवघेणी वाहतूक होत आहे. तर बाभूळगाव तालुक्यातील नांदुराचा पूल अनेक जण उपयोगात आणतात. महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेने या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ब्रिटिशांनी अनेक मजबूत पुलांची निर्मिती केली. त्यापैकीच एक पूल म्हणजे यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील रुंझा येथील पूल होय. १९०० ते १९१०च्या दरम्यान या पुलाचे बांधकाम झाल्याची आठवण जुने-जाणते सांगतात. ११६ वर्षाचा झालेला हा पूल आता अतिशय जीर्णय झाला आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती आहे. अरुंद असलेल्या पुलावरील क्राँकीट उखडले असून बांधकामाला तडे गेले आहे. पुलावर सुरक्षा कठडेही नाही. हा पूल वापरण्यास योग्य नसल्याचे पत्र दहा वर्षापूर्वी ब्रिटीश सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले होते. त्यानंतर रुंझा येथे नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली. गावाच्या बाहेरुन ६०० मीटर लांबीचा बायपास काढण्यात आला. जवळपास एक कोटी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. आता जुना पूल बंद होईल आणि नवीन पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बायपास रस्त्याचे काम काही दिवसातच उखडले. रस्ता एवढा निकृष्ट झाला की वाहन तर सोडा पायदळ चालणेही कठीण झाले. परिणामी वाहनधारकांनी आता ब्रिटिशकालीन पुलावरूनच वाहने हाकणे सुरू केले. बायपास रस्त्याच्या अवस्थेने वाहनधारक नाईलाजाने जुन्याच पुलावरून वाहने नेत आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद असल्याचे घोषित केले. परंतु आजही वाहनधारक याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहने नेतात. त्यामुळे महाडसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माघार कुणी घ्यावी यावरून व्हायची भांडणे बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील बेंबळा नदीवर ब्रिटिशांनी १३८ वर्षापूर्वी पूल बांधला होता. लोखंडी साहित्याने बांधलेला हा पूल रेल्वेसाठी असावा असे जाणकार सांगतात. पूर्वी या अरुंद पुलावरून जाताना अनेक गंमती घडायच्या. मारामारीचे प्रसंग उभे रहायचे. पोलिसांना धाव घ्यावी लागायची. कारण या पुलावरून केवळ एकच वाहन जाऊ शकत होते. दुसरे वाहन समोरुन आले की, एका वाहनाला मागे घ्यावे लागत होते. यातून अनेक प्रसंग उद्भवले. धामणगाववरून मंत्र्यांचा ताफा येत होता त्यावेळी पुलाच्या दोनही बाजूला पोलीस तैनात केले जायचे. कापसाची बैलगाडी तर तासन्तास पुलाच्या कडेला उभी असायची. २००९ मध्ये या जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधला. बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद केला. मात्र त्यानंतरही या जुन्या पुलावर वर्दळ कायम असते. बैलगाडी, दुचाकी, गुरेढोरे आणि पायदळही वाहतूक सुरूच असते. विजय दर्डा यांचे मानले आभार नांदुरा येथील अरूंद पुलामुळे विविध समस्या उद्भवत होत्या. ही बाब लक्षात येताच लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री टी.आर.बालू यांना नवीन पुलाची गरज पटवून दिली. त्यासाठी त्यांनी केंद्रीय निधी खेचून आणला. या पुलावर टोल टॅक्स लागू नये, अशी व्यवस्थाही विजय दर्डा यांनी निधी मंजूर करतानाच करून ठेवली. यानंतर १५ फेब्रुवारी २००७ रोजी जुन्या पुलालगत एकाचवेळी तीन ते चार वाहने जाऊ शकतील, अशा टोलेजंग पूल बांधकामाला सुरूवात झाली. १४ डिसेंबर २००८ रोजी नवीन पूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. यामुळे सर्व भांडण, तंटे बंद झाले. यामुळे परिसरातील नागरिकांनी विजय दर्डा यांचे पत्र पाठवून आभार मानले. हा नवीन पूल २४२ मीटर लांब, १०.५० मीटर रूंद आहे. पुलाला आठ पीलर आहेत. तीन पदरी पूल आहे. या पुलाला त्यावेळी आठ कोटी २० लाख रूपये बांधकाम खर्च आला.