शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दारव्हाच्या संस्थेने उचलली अनाथ मुलींच्या विवाहाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:28 IST

शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्ट, असे या संस्थेचे नाव आहे. संस्थेचे अध्यक्ष खिलेश प्रवीणचंद्र घेरवरा यांनी त्याबाबतचे पत्र ...

शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्ट, असे या संस्थेचे नाव आहे. संस्थेचे अध्यक्ष खिलेश प्रवीणचंद्र घेरवरा यांनी त्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले. या कार्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात शेकडो नागरिकांना विषाणूचे संक्रमण झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.

दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुली अनाथ झाल्या. कुटुंबांचा आधार गेल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. अशा मुलींची कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली. विवाहयोग्य मुलींच्या विवाहाचा मोठा प्रश्न आहे. अशा कुटुंबावर अचानक कोसळलेल्या संकटाने येथील शाह शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्टचे संस्था चालक व्यथित झाले. या घटनेमुळे झालेली हानी भरून काढता येणार नाही; परंतु लग्नासारखे कार्य निर्विघ्न पार पडावे, याकरिता संस्थेने त्यांच्या विवाहाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

संस्थेतर्फे अनाथ मुलींचे संपूर्ण खर्चासह लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वधू, वरांचे कपडे, पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था व इतर लागणारे साहित्य आणि त्या-त्या समाजातील परंपरेनुसार कन्यादानाकरिता लागणारे साहित्य संस्थेकडून पुरविण्यात येईल. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष खिलेश घेरवरा यांनी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात त्यांनी पुढील नियोजनाच्या दृष्टीने या आजारामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील मुलींची यादी मागितली आहे. त्यानंतर प्रशासनाच्या परवानगीने मुलींना तिच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी लग्न समारंभ पार पडला जाईल.

बॉक्स

धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था

संस्थेचे दारव्हाची ओळख असलेले सुप्रसिद्ध अंबादेवी मंदिर आहे. येथे नवरात्र व वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच पंढरपूर येथे मंदिर, भक्तनिवास आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना भोजन आणि निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष खिलेश घेरवरा यांनी वृद्धाश्रमांना बांधकाम साहित्य, अन्नधान्य व इतर वस्तूंची अनेकदा मदत केली. इतर सामाजिक कार्यात ते पुढाकार घेतात. कोरोना काळात त्यांनी अनेक उपक्रम राबविले. सामाजिक कार्याचा वसा त्यांनी यानिमित्ताने सुरू ठेवला आहे.

कोट

माझी दोन मंगल कार्यालये कोविड सेंटरकरिता दिली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची अवस्था मी जवळून पाहिली. संकटाच्या या काळात आपलेही काही योगदान राहावे, याकरिता संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

-खिलेश घेरवरा, संस्था अध्यक्ष, दारव्हा