शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

इस्टीमेटवरच कोट्यवधींचे व्यवहार

By admin | Updated: February 20, 2017 01:32 IST

शासनाने कर चुकवेगिरीचा फार्स आवरून कराच्या माध्यमातून शासनाच्या उत्पन्न वाढविण्यासाठी नुकतीच नोटबंदी केली.

नोटाबंदीचाही परिणाम नाही : व्यापाऱ्यांकडून कर चुकवेगिरी सुरूचवणी : शासनाने कर चुकवेगिरीचा फार्स आवरून कराच्या माध्यमातून शासनाच्या उत्पन्न वाढविण्यासाठी नुकतीच नोटबंदी केली. मात्र यावरही मात करून व्यापारी विविध शकली लढवून अजूनही कर चुकवेगिरी करीतच असल्याचे दिसून येते.ज्यांचे उत्पन्न कागदोपत्री दिसतात, अशा कर्मचाऱ्यांकडून शासनाला इमानदारीने कर मिळतो. परंतु जे उद्योजक व्यापारी यांचे उत्पन्न कागदोपत्री येत नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर बुडविला जातो. यावर मात करण्यासाठी शासनाने विविध कर विभाग स्थापन केले. परंतु उत्पन्नच लेखी नसल्यामुळे या विभागाचाही कर वसुलीसाठी नाईलाज ठरतो. आता नोटाबंदीनंतर मोठे व्यवहार नगदी स्वरूपात करू नये, असा नियम शासनाने केला असला तरी व्यापारी व उद्योजक मात्र सफाईदारपणे व्यवहार करून कराची लपवणूक करीतच असल्याचे दिसून येते.ग्राहकांचे हीत जोपासण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तीत्वात आला. मात्र ग्राहकात याबाबत जागृती नसल्याने कोणी व्यापाऱ्याकडून पक्के बिल मागण्याचा आग्रह धरीत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून इस्टीमेट बिलावरच व्यवहार केले जातात. त्यातूनच शासनाचा प्रचंड कर डुबतो. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकाने कोणत्याही दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के बिल देणे व्यापाऱ्याला बंधनकारक आहे. मात्र बोटोवर मोजण्याइतके व्यापारी अपवाद वगळता बहुतांश व्यापारी कोटेशन बिलावरच व्यवहार करतात. बाजारात एक नंबर व दोन नंबर, अशे दोन प्रकारचे व्यवहार होतात. एक नंबरच्या व्यवहारात ग्राहकाला पक्के बिल दिले जाते. हे व्यवहार व्यापाऱ्याला वार्षिक लेख्यांमध्ये घ्यावे लागतात. पर्यायाने त्यावर मिळालेल्या उत्पन्नावर विक्री कर, आयकर, व्हॅट, असे विविध कर भरावे लागतात. हे सर्व कर वाचविण्यासाठी मग व्यापारी दोन नंबरच्या व्यवहाराचा मार्ग अवलंबतात. मात्र याचा ग्राहकांना कवडीचाही फायदा होत नाही. किराणा दुकानाचे व्यवहार, तर ग्राहकांच्या डायरीवर किंवा कागदावरच होतात. कापडाच्या दुकानात लग्न समारंभाचे लाखो रूपयांचे व्यवहारसुद्धा इस्टीमेट बिलावरच होतात. यंत्र सामुग्रीच्या दुकानातही व्यवहार कोटेशनवरच चालतात. एवढेच नव्हे तर सोन्या-चांदीच्या दुकानातूनुसद्धा ग्राहकाला पक्के बिल मिळत नाही. ग्राहकांनी पक्के बिल मागितले, तर त्याला अधिक भाव सांगितला जातो. शासनाचा कर गोळा करणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांना या सर्व व्यवहाराची माहिती असूनही त्याकडे त्यांची डोळेझाक होते, याचे गुपित काय, हे सहज समजण्यासारखे आहे. कर विभागातील अपुरा कर्मचारी वर्ग, करदात्यांनी अवाढव्य संख्या, यामुळेही कर वसुलीमध्ये अडथळे निर्माण होत असतात. परिणामी शासनाचे कर स्त्रोत मोठ्या प्रमाणात खंडित होऊन कराची वसुली कमी होते. जीवन मरणाशी संबंधित असणाऱ्या औषधी दुकानातसुद्धा ग्राहकांना मागितल्याश्विाय बिल मिळत नाही. डॉक्टरच्या चिठ्ठीच्या मागील बाजूसच हिशोब करून व्यवहार केला जातो. यात दुर्दैैवाने आजारी व्यक्तीचे बरेवाईट झाल्यास ग्राहकालाच त्याचे नुकसान सोसावे लागते. मोठमोठ्या दवाखान्यांमध्येसुद्धा तपासणी व उपचारासाठी मोठी रक्कम वसुल केली जाते. मात्र त्याचेही बिलही डॉक्टरांकडून ग्राहकाला मिळत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)ग्राहकांचे मरण, तर व्यापाऱ्यांचे उदरभरणदुकानांमध्ये शासनाचा कर वाचवून व्यवहार होत असला तरी ग्राहकाला मात्र ती वस्तू स्वस्तात मिळत नाही. मग वाचविलेला कर हा व्यापाऱ्यांच्याच घशात जातो. तरीही ग्राहक व्यापाऱ्यांकडून बिल घेण्यासाठी जागृक नसतात. ग्राहकाने प्रत्येक व्यवहाराचे व्यापाऱ्याकडून पक्के बिल घेतल्यास शासनाला हातभार लागू शकतो. मात्र यासाठी ग्राहक संरक्षण समित्यांनीही जागृती करणे गरजेचे बनले आहे.