शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

इस्टीमेटवरच कोट्यवधींचे व्यवहार

By admin | Updated: February 20, 2017 01:32 IST

शासनाने कर चुकवेगिरीचा फार्स आवरून कराच्या माध्यमातून शासनाच्या उत्पन्न वाढविण्यासाठी नुकतीच नोटबंदी केली.

नोटाबंदीचाही परिणाम नाही : व्यापाऱ्यांकडून कर चुकवेगिरी सुरूचवणी : शासनाने कर चुकवेगिरीचा फार्स आवरून कराच्या माध्यमातून शासनाच्या उत्पन्न वाढविण्यासाठी नुकतीच नोटबंदी केली. मात्र यावरही मात करून व्यापारी विविध शकली लढवून अजूनही कर चुकवेगिरी करीतच असल्याचे दिसून येते.ज्यांचे उत्पन्न कागदोपत्री दिसतात, अशा कर्मचाऱ्यांकडून शासनाला इमानदारीने कर मिळतो. परंतु जे उद्योजक व्यापारी यांचे उत्पन्न कागदोपत्री येत नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर बुडविला जातो. यावर मात करण्यासाठी शासनाने विविध कर विभाग स्थापन केले. परंतु उत्पन्नच लेखी नसल्यामुळे या विभागाचाही कर वसुलीसाठी नाईलाज ठरतो. आता नोटाबंदीनंतर मोठे व्यवहार नगदी स्वरूपात करू नये, असा नियम शासनाने केला असला तरी व्यापारी व उद्योजक मात्र सफाईदारपणे व्यवहार करून कराची लपवणूक करीतच असल्याचे दिसून येते.ग्राहकांचे हीत जोपासण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तीत्वात आला. मात्र ग्राहकात याबाबत जागृती नसल्याने कोणी व्यापाऱ्याकडून पक्के बिल मागण्याचा आग्रह धरीत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून इस्टीमेट बिलावरच व्यवहार केले जातात. त्यातूनच शासनाचा प्रचंड कर डुबतो. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकाने कोणत्याही दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के बिल देणे व्यापाऱ्याला बंधनकारक आहे. मात्र बोटोवर मोजण्याइतके व्यापारी अपवाद वगळता बहुतांश व्यापारी कोटेशन बिलावरच व्यवहार करतात. बाजारात एक नंबर व दोन नंबर, अशे दोन प्रकारचे व्यवहार होतात. एक नंबरच्या व्यवहारात ग्राहकाला पक्के बिल दिले जाते. हे व्यवहार व्यापाऱ्याला वार्षिक लेख्यांमध्ये घ्यावे लागतात. पर्यायाने त्यावर मिळालेल्या उत्पन्नावर विक्री कर, आयकर, व्हॅट, असे विविध कर भरावे लागतात. हे सर्व कर वाचविण्यासाठी मग व्यापारी दोन नंबरच्या व्यवहाराचा मार्ग अवलंबतात. मात्र याचा ग्राहकांना कवडीचाही फायदा होत नाही. किराणा दुकानाचे व्यवहार, तर ग्राहकांच्या डायरीवर किंवा कागदावरच होतात. कापडाच्या दुकानात लग्न समारंभाचे लाखो रूपयांचे व्यवहारसुद्धा इस्टीमेट बिलावरच होतात. यंत्र सामुग्रीच्या दुकानातही व्यवहार कोटेशनवरच चालतात. एवढेच नव्हे तर सोन्या-चांदीच्या दुकानातूनुसद्धा ग्राहकाला पक्के बिल मिळत नाही. ग्राहकांनी पक्के बिल मागितले, तर त्याला अधिक भाव सांगितला जातो. शासनाचा कर गोळा करणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांना या सर्व व्यवहाराची माहिती असूनही त्याकडे त्यांची डोळेझाक होते, याचे गुपित काय, हे सहज समजण्यासारखे आहे. कर विभागातील अपुरा कर्मचारी वर्ग, करदात्यांनी अवाढव्य संख्या, यामुळेही कर वसुलीमध्ये अडथळे निर्माण होत असतात. परिणामी शासनाचे कर स्त्रोत मोठ्या प्रमाणात खंडित होऊन कराची वसुली कमी होते. जीवन मरणाशी संबंधित असणाऱ्या औषधी दुकानातसुद्धा ग्राहकांना मागितल्याश्विाय बिल मिळत नाही. डॉक्टरच्या चिठ्ठीच्या मागील बाजूसच हिशोब करून व्यवहार केला जातो. यात दुर्दैैवाने आजारी व्यक्तीचे बरेवाईट झाल्यास ग्राहकालाच त्याचे नुकसान सोसावे लागते. मोठमोठ्या दवाखान्यांमध्येसुद्धा तपासणी व उपचारासाठी मोठी रक्कम वसुल केली जाते. मात्र त्याचेही बिलही डॉक्टरांकडून ग्राहकाला मिळत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)ग्राहकांचे मरण, तर व्यापाऱ्यांचे उदरभरणदुकानांमध्ये शासनाचा कर वाचवून व्यवहार होत असला तरी ग्राहकाला मात्र ती वस्तू स्वस्तात मिळत नाही. मग वाचविलेला कर हा व्यापाऱ्यांच्याच घशात जातो. तरीही ग्राहक व्यापाऱ्यांकडून बिल घेण्यासाठी जागृक नसतात. ग्राहकाने प्रत्येक व्यवहाराचे व्यापाऱ्याकडून पक्के बिल घेतल्यास शासनाला हातभार लागू शकतो. मात्र यासाठी ग्राहक संरक्षण समित्यांनीही जागृती करणे गरजेचे बनले आहे.