शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

४६ हजार हेक्टरवर संकट

By admin | Updated: August 19, 2014 23:59 IST

पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार

पावसाची दडी : केवळ ४० टक्के पाऊस, कपाशी, सोयाबीन करपतेयवणी : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार हेक्टरातील पिके तूर्तास समाधानकारक असली, तरी पाऊस न आल्यास त्यांचीही स्थिती नाजूक होणार आहे. मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दणका दिला आहे. मध्यंतरी तुरळक पाऊस आल्याने शेती पिकांना जीवनदान भेटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा गेल्या तीन हप्त्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. जुलै महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलेलेले हास्य आता लोप पावत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. तशाही स्थितीत तालुक्यात यावर्षी ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. सोबतच आठ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी पूर्ण केली होती. तथापि पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. कपाशी सोबतच शेतकऱ्यांना २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली होती.तालुक्यात खरीपात ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. शेतकऱ्यांनी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील दाग-दागिने, शेती गहाण ठेवून कर्ज काढले. त्यानंतर कशीबशी दुबारच नव्हे, तर तिबार पेरणी केली. मात्र आता पावसाने पुन्हा त्यांना चिंताक्रांत केले आहे. गेल्या तीन हप्त्यांपासून पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. आधी दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांना महागडे रासायनिक खत, महागडे किटकनाशक खरेदी करावे लागले. सोबतच निंदण, डवरणीचा खर्च करावा लागला. मजुरांना बाहेर गावावरून आॅटोने आणावे लागले. या सर्व त्रासापासून मुक्तता होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेती पिकांची जिवापाड जोपासना केली. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहे. कर्ज कसे फेडावे, घरातील कार्य कशी करावी, प्रपंच कसा चालवालवा, या प्रश्नांनी त्यांना हैराण केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)