शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परसबागेत फुलझाडे, सेंद्रीय भाजीपाल्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:46 IST

येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.

ठळक मुद्देवानखडे दाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम : ओल्या, सुक्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट

मुकेश इंगोले ।आॅनलाईन लोकमतदारव्हा : येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.छोटासा गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे ओल्या, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावल्या जाते. डासांचा त्रास नाही. सर्वत्र हिरवळ असल्याने वातावरण प्रसन्न राहते. शिवाय घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला तयार होतो, असे सर्व फायदे असल्यामुळे या कुटुंबाचा हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरला आहे. येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे प्रा.अतुल वानखडे यांना सुरुवातीपासूनच या कार्याची आवड आहे. त्यात त्यांना एमएस्सी कृषी शिक्षण घेतलेल्या पत्नी भावनातार्इंची साथ मिळाली आणि या दोघांचा उत्साह व मेहनीतून सुंदर अशी परसबाग तयार झाली. घराच्या अंगणात जागा करून तसेच कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी, विदेशी शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली. त्यामध्ये शेवंती, कोलीअस, अ‍ॅन्शेरियम, गॅलेरडीया, जरनेरा, अ‍ॅडोनियम, मोगरा, ग्लॅडिओली, डेहेलिया, सकुलंट, हँगीग प्लँन्टस, अ‍ॅरिला क्रोटान यासह इतर शोभेच्या व फुलांच्या झाडांचा समावेश आहे. त्यांनी घराच्या छतावर शेड तयार करून भाजीपाल्याची लागवड केली. काही जागेवर वाफे केले. टाकावू वस्तूंचा वापर करून भाज्यांची लागवड केली. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, मेथी, पालक, भेंडी, सांभार, शेपू, फुलकोबी, वालाच्या शेंगा, लवकी, काकडी, कारले तर रताळ, गाजाराचे उत्पन्न घेतल्या जाते. यावर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. शंभर टक्के सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो. त्यासाठी गांडूळ खत तयार केले जाते. यामुळे फुलझाडे व भाजीपाल्याकरिता खत मिळते. घरातील कचरा, झाडांची पाने यांची विल्हेवाट लागते तर सुका कचरा जाळला जातो. त्यामुळे या घरातून कचºयाचा कणसुद्धा बाहेर जात नाही. सर्वत्र स्वच्छता असल्याने डास तयार होत नाही. अंगण व छतावरील झाडांमुळे वातावरण थंड राहते. प्रसन्न वाटते. विशेष म्हणजे छतावरील शेड सोडले तर कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.पालिकेला प्रेरणादायीनगरपरिषदेच्या शहर स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी बजावू शकेल असा हा वानखडे दाम्पत्याचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांनी यातून प्रेरणा घेऊन शहराच्या सौंदर्यात भर घातली पाहिजे.