शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

परसबागेत फुलझाडे, सेंद्रीय भाजीपाल्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:46 IST

येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.

ठळक मुद्देवानखडे दाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम : ओल्या, सुक्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट

मुकेश इंगोले ।आॅनलाईन लोकमतदारव्हा : येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.छोटासा गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे ओल्या, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावल्या जाते. डासांचा त्रास नाही. सर्वत्र हिरवळ असल्याने वातावरण प्रसन्न राहते. शिवाय घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला तयार होतो, असे सर्व फायदे असल्यामुळे या कुटुंबाचा हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरला आहे. येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे प्रा.अतुल वानखडे यांना सुरुवातीपासूनच या कार्याची आवड आहे. त्यात त्यांना एमएस्सी कृषी शिक्षण घेतलेल्या पत्नी भावनातार्इंची साथ मिळाली आणि या दोघांचा उत्साह व मेहनीतून सुंदर अशी परसबाग तयार झाली. घराच्या अंगणात जागा करून तसेच कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी, विदेशी शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली. त्यामध्ये शेवंती, कोलीअस, अ‍ॅन्शेरियम, गॅलेरडीया, जरनेरा, अ‍ॅडोनियम, मोगरा, ग्लॅडिओली, डेहेलिया, सकुलंट, हँगीग प्लँन्टस, अ‍ॅरिला क्रोटान यासह इतर शोभेच्या व फुलांच्या झाडांचा समावेश आहे. त्यांनी घराच्या छतावर शेड तयार करून भाजीपाल्याची लागवड केली. काही जागेवर वाफे केले. टाकावू वस्तूंचा वापर करून भाज्यांची लागवड केली. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, मेथी, पालक, भेंडी, सांभार, शेपू, फुलकोबी, वालाच्या शेंगा, लवकी, काकडी, कारले तर रताळ, गाजाराचे उत्पन्न घेतल्या जाते. यावर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. शंभर टक्के सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो. त्यासाठी गांडूळ खत तयार केले जाते. यामुळे फुलझाडे व भाजीपाल्याकरिता खत मिळते. घरातील कचरा, झाडांची पाने यांची विल्हेवाट लागते तर सुका कचरा जाळला जातो. त्यामुळे या घरातून कचºयाचा कणसुद्धा बाहेर जात नाही. सर्वत्र स्वच्छता असल्याने डास तयार होत नाही. अंगण व छतावरील झाडांमुळे वातावरण थंड राहते. प्रसन्न वाटते. विशेष म्हणजे छतावरील शेड सोडले तर कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.पालिकेला प्रेरणादायीनगरपरिषदेच्या शहर स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी बजावू शकेल असा हा वानखडे दाम्पत्याचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांनी यातून प्रेरणा घेऊन शहराच्या सौंदर्यात भर घातली पाहिजे.