शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

वाढोणा येथे कापूस व्यापाऱ्यांची मनमानी

By admin | Updated: April 1, 2017 00:35 IST

कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत.

मंगेश चवरडोल   किन्ही (जवादे) कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत. विविध कारणे पुढे करून क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार, लोणबले, यंगारे हे वाढोणा बाजार येथील विमल अ‍ॅग्रो जिनिंगमध्ये कापूस विकण्यासाठी गेले होते. त्यांच्या कापसाला चार हजार ६०० ते चार हजार ९०० रुपये दर दिला जाईल, असे सांगण्यात आले. कापसावर पाणी मारून आहे, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्ष कापसाचा दर पाच हजार ६०० ते पाच हजार ८०० रुपये आहे. शेवटी या शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन परत पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या कापसावर पाणी मारले असल्याचा आरोप केला जातो. दुसरीकडे याच जिनिंगमध्ये मोटर लावून कापसावर पाणी मारले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. सदर प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार यांनी आपल्या कापसाला चार हजार ८०० रुपये दर दिल्याचे सांगितले. कापसू पाण्याचा असल्याचा आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले.