शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

काँग्रेस आमदारांविरुद्ध कार्यकर्त्यांचा ‘एल्गार’

By admin | Updated: June 26, 2014 00:00 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री-आमदारांमुळेच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यापासून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मंत्री, आमदार, त्यांचे कौटुंबिक वारसदार

पुन्हा उमेदवारीस विरोध : जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी जोर यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री-आमदारांमुळेच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यापासून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मंत्री, आमदार, त्यांचे कौटुंबिक वारसदार अशा प्रस्थापितांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेते-पदाधिकाऱ्यांची बैठक आज रेमंड विश्रामभवनावर सकाळी घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापुढे रोखठोक भूमिका मांडण्याचे ठरले होते. परंतु रेल्वे आंदोलनाचे निमित्त करून माणिकरावांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. तरीही या नेत्यांनी बैठक घेतली. त्यात पक्षाचे मंत्री व आमदारांच्या भूमिकेबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोनही मंत्री पराभूत होण्याला नेत्यांची गटबाजी आणि पाच वर्ष निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचा सूर उमटला. आता विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यात माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार या नेत्यांनी मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु जिल्ह्यात काँग्रेसच्या कोणत्याही विद्यमान आमदाराला अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला, प्रस्थापित नेत्याला पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी रोखठोक भूमिका पक्षश्रेष्ठींपुढे मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. त्याबाबतची माहिती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोनवरून देण्यात आली. लोकसभेतील पराभवाचे कारण पुढे करून वामनराव कासावार यांनी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. परंतु या पराभवास काँग्रेस कार्यकर्ते जबाबदार कसे, त्यांच्यावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कासावारांनी आधी स्वत: जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष हा मंत्री-आमदार यांच्या सूचनेनुसार नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्व मान्य असेल त्यातून ठरावा, अशीही भूमिका यावेळी मांडली गेली. हरिभाऊ राठोड यांना आमदारकी देण्याच्या निर्णयाविरुद्धही रोष व्यक्त केला गेला. राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत बैठकीत एका पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले. असे झाल्यास त्याला कार्यकर्त्यांचा विरोध राहील, हा प्रकार होऊ नये, अशी मागणी श्रेष्ठींकडे केली जाईल. पाहिजे तर पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित करावा, अशी भूमिका मांडली गेली. या बैठकीला मोहंमद नदीम, अजय पुरोहित, देवानंद पवार, अरुण राऊत, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, दिनेश गोगरकर, विवेक दौलतकर, अनिल गायकवाड, शिवाजीराव देशमुख सवनेकर, अशोक बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, संतोष बोरले, कृष्णा कडू, वजाहत मिर्झा, वसंत राठोड, डॉ. रामचरण चव्हाण, तातू देशमुख आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)