शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मारेगावात काँग्रेसने बाजी मारली

By admin | Updated: February 24, 2017 02:37 IST

तालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले,

गणात काँग्रेसला दोन जागा : शिवसेना, भाजपाला प्रत्येकी एक जागाअण्णाभाऊ कचाटे   मारेगावतालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले, तर मार्डी व वेगाव गणात काँग्रेसचे दोन, तर कुंभा गणात शिवसेना व बोटोणी गणात भाजपाचा उमेदवार विजयी झाला.जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीच्या चार गणांसाठी झालेल्या निवडणुकीचा गुरूवारी निकाल घोषित झाला. यात बोटोणी-वेगाव गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल जनार्धन देरकर ७०७३ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे रमन डोये यांचा १७४६ मतांनी पराभव केला. येथे शिवसेना तिसऱ्या स्थानावर राहिली.बोटोणी गणातून भारतीय जनता पार्टीच्या सुनिता शंकर लालसरे ३१७० मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माया पेंदोर यांचा १४६ मतांनी पराभव केला. वेगाव गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शितल रवींद्र पोटे ३५९८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी भाजपाच्या रूपाली विश्वजित गारघाटे यांचा १११७ मतांनी पराभव केला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झालेल्या कुंभा-मार्डी गटातील वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या अरूणा अरूण खंडाळकर ८३४८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेनेच्या डिमन टोंगे यांचा दोन हजार ९८५ मतांनी पराभव केला. कुंभा गणातून शिवसेनेचे संजय आवारी ३६२१ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गजानन खापने यांचा ७१८ मतांनी पराभव केला. मार्डी गणातून काँग्रेसचे श्रीकृष्ण कुमरे ४४८४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे विठ्ठल कोयचाडे यांचा २०२१ मतांनी पराभव केला.सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणूनच पाहिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही, तर कुंभा, मार्डी गणात त्यांना उमेदवारही मिळाला नाही. यावेळी काँगे्रसचे गट एकत्र आल्यानेच त्यांना यश प्राप्त करता आल्याचे समजते. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गजांना पराभवांना सामोरे जावे लागले. यात शिवसेना तालुका प्रमुख गजानन किन्हेकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, काँग्रेसचे विद्यमान उपसभापती गजानन खापने, भाजपाचे महामंत्री रमण डोये, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष माया पेंदोर यांना पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पंचायत समितीमध्ये काँग्रेस दोन, शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल होते. यावेळी काँग्रेस दोन, शिवसेना एक, भाजपा एक, असे पक्षीय बलाबल राहणार आहे. त्यामुळे बहुमत कुणालाही नाही.