शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पुत्रप्रेमापोटी काँग्रेसचे उमेदवार वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष

विधानसभा निवडणूक : प्रदेशाध्यक्षांचे संपूर्ण लक्ष केवळ यवतमाळ मतदार संघातचयवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष याच मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील अन्य सहा उमेदवार माणिकरावांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहे. वणीमधून वामनराव कासावार, आर्णीतून अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, राळेगावातून प्रा.वसंत पुरके, यवतमाळातून राहुल ठाकरे, दिग्रसमधून देवानंद पवार, पुसदमध्ये सचिन नाईक तर उमरखेडमध्ये विजय खडसे हे काँग्रेसचे उमेदवार आहे. माणिकराव ठाकरे यांचा गृहजिल्हा यवतमाळ आहे. त्यामुळे किमान आपल्या जिल्ह्यात तरी सर्व सातही जागा काँग्रेसच्या निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाचही आमदार स्वकर्तृत्वावर निवडून आले होते. नीलेश पारवेकरांनी आपल्या कार्यकाळात पक्षात युवक काँग्रेसची फौज निर्माण केली. विकासाचा झंझावात त्यांनी निर्माण केला होता. मोघे, कासावार, पुरके यांनी निवडणुकीत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यातून निवडणुका कशा जिंकायच्या याचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मोघेंनी आपल्या खात्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. दलित-आदिवासी व गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रा. वसंत पुरके यांनीही शिक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रभावी राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे की यवतमाळ शहराचे ? माणिकरावांचे मुलाच्या प्रचारासाठी यवतमाळात असलेले सततचे वास्तव्य पाहता माणिकराव ठाकरे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत की, यवतमाळ शहराचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारवर नेहमीच पक्षाचे नियंत्रण राहिले आहे. परंतु याबाबतीत माणिकराव ठाकरे मुख्यमंत्र्यांपुढे कमजोर ठरले. आजही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्र्यांवरच राज्याची प्रचाराची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत पार्टी फंड बाबतची माणिकरावांकडील सूत्रे काढून घेऊन त्यासाठी वेगळी यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी निर्माण केली होती. विधानसभेतसुद्धा संपूर्ण सूत्रे ही मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा माणिकरावांच्या कार्यकाळात पार पडल्या. मात्र त्यातून पक्षाला काहीएक फायदा झाला नाही. उलट लोकसभेत काँग्रेसचा सफाया होऊन केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केलेले मुद्दे माणिकरावांना खोडून काढता आले नाही किंवा त्यावर प्रभावी उत्तरही ते देऊ शकलेले नाही. हे उत्तर देण्याऐवजी माणिकराव मुलाच्या प्रचारार्थ प्रदेश वाऱ्यावर सोडून केवळ यवतमाळात बसून आहेत. राज्यात सरकारने विकास कामे केली. मात्र ही कामे जनतेपर्यंत पोहाचू शकली नाही. यावरून माणिकरावांचे संघटन कौशल्य किती कमजोर आहे आणि त्यांच्या कार्यकाळात पक्ष-संघटनेची काय अवस्था झाली हे लक्षात येते.