शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील गटबाजी पराभवानंतरही संपेना !

By admin | Updated: November 14, 2015 02:41 IST

काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

यवतमाळ : काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु यावेळी लोकसभा, विधानसभा व आता नगरपंचायतीमध्ये सपाटून मार खालल्यानंतरही काँग्रेस नेत्यांमध्ये एकजूट दिसत नाही. उलट त्यांच्यातील स्पर्धा, रस्सीखेच व गटबाजीचेच दर्शन अधिक होत असल्याचे पहायला मिळते. काँग्रेस पक्षाकडे सत्ता असली की नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट पहायला मिळतात. नेत्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते वाटचाल करतात. परंतु कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला पराभव आल्यानंतर मात्र ही नेते मंडळी एका छत्राखाली येऊन पक्षासाठी काम करीत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी मात्र या परंपरेच्या अगदी विपरित घडताना दिसत आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाला. त्यानंतर सहा महिने त्यांच्या हाती होते. मात्र त्यांच्यात एकजूट दिसली नाही. त्याचा परिणाम विधानसभेत झाला. यवतमाळ जिल्ह्यात तर पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. परंतु त्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताच धडा घेतला नाही. पराभवानंतर एकजूट होण्याची परंपरा त्यांनी खंडित करीत एकमेकांच्या विरोधात छुपी मोर्चेबांधणी कायम ठेवली. जिल्ह्यात नुकत्याच सहा नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र तेथेसुद्धा पाच ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. बाभूळगावातही मतदारांनी काँग्रेसला बहुमतापासून दोन हात दूरच ठेवले. कालपर्यंत ग्रामपंचायती असलेल्या या संस्था बहुतांश काँग्रेसच्याच ताब्यात होत्या. वर्षानुवर्षे तेथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वातील पॅनलचीच सत्ता राहिली. परंतु नगरपंचायती होताच तेथील काँग्रेसची सत्ता भाजपा-सेनेने उलथवून लावली. सहा पैकी केवळ एका नगरपंचायतीची काँग्रेसला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस नेते मात्र लोकसभा, विधानसभेच्या तुलनेत नगरपंचायतीमध्ये पक्षाची स्थिती चांगली राहिल्याचे सांगून स्वत:च स्वत:चे समाधान करून घेताना दिसत आहे. नगरपंचायतीमध्ये १०२ पैकी २९ जागा भाजपाला तर २७ काँग्रेसला मिळाल्या. या २७ जागा म्हणजे काँग्रेस शून्यावरून ५० टक्क्यावर आल्याचे नेते सांगत आहे. परंतु या पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांची गटबाजी थांबायचे नाव घेत नाही. उलट त्यांच्यामध्ये कुठे उघड तर कुठे छुपी स्पर्धा पहायला मिळते. सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीला नवीन अध्यक्ष आणि त्यानंतर येणाऱ्या विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता पुढील चार वर्ष कोणतेच काम नसल्याने अनेक जण जिल्हाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेस पक्षाच्या राजकीय रणांगणातील एका नेत्याने तर आधी जिल्हाध्यक्ष व नंतर विधान परिषदेचे तिकीट असे दुहेरी टार्गेट आपल्या ‘दूरदृष्टी’पुढे ठेवले आहे. विधान परिषद लढविण्याची अनेकांची मनिषा आहे. त्या दृष्टीने त्यांनी छुपी चाचपणी व मोर्चेबांधणीही चालविली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी सर्वच राजकीय पक्ष अमरावती विभागाच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यात भाजपाच्या रणजित पाटलांना चीत करण्यासाठी काँग्रेसमध्ये एका जुन्या दीर्घ अनुभवी व अभ्यासू नेत्याला रणांगणात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)