शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

काँग्रेसमधील गटबाजी पराभवानंतरही संपेना !

By admin | Updated: November 14, 2015 02:41 IST

काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

यवतमाळ : काँग्रेसमध्ये एरव्ही गटबाजी दिसत असली तरी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसची नेते मंडळी एकजुटीने कामाला लागल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु यावेळी लोकसभा, विधानसभा व आता नगरपंचायतीमध्ये सपाटून मार खालल्यानंतरही काँग्रेस नेत्यांमध्ये एकजूट दिसत नाही. उलट त्यांच्यातील स्पर्धा, रस्सीखेच व गटबाजीचेच दर्शन अधिक होत असल्याचे पहायला मिळते. काँग्रेस पक्षाकडे सत्ता असली की नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट पहायला मिळतात. नेत्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते वाटचाल करतात. परंतु कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला पराभव आल्यानंतर मात्र ही नेते मंडळी एका छत्राखाली येऊन पक्षासाठी काम करीत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी मात्र या परंपरेच्या अगदी विपरित घडताना दिसत आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाला. त्यानंतर सहा महिने त्यांच्या हाती होते. मात्र त्यांच्यात एकजूट दिसली नाही. त्याचा परिणाम विधानसभेत झाला. यवतमाळ जिल्ह्यात तर पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. परंतु त्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताच धडा घेतला नाही. पराभवानंतर एकजूट होण्याची परंपरा त्यांनी खंडित करीत एकमेकांच्या विरोधात छुपी मोर्चेबांधणी कायम ठेवली. जिल्ह्यात नुकत्याच सहा नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र तेथेसुद्धा पाच ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. बाभूळगावातही मतदारांनी काँग्रेसला बहुमतापासून दोन हात दूरच ठेवले. कालपर्यंत ग्रामपंचायती असलेल्या या संस्था बहुतांश काँग्रेसच्याच ताब्यात होत्या. वर्षानुवर्षे तेथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वातील पॅनलचीच सत्ता राहिली. परंतु नगरपंचायती होताच तेथील काँग्रेसची सत्ता भाजपा-सेनेने उलथवून लावली. सहा पैकी केवळ एका नगरपंचायतीची काँग्रेसला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस नेते मात्र लोकसभा, विधानसभेच्या तुलनेत नगरपंचायतीमध्ये पक्षाची स्थिती चांगली राहिल्याचे सांगून स्वत:च स्वत:चे समाधान करून घेताना दिसत आहे. नगरपंचायतीमध्ये १०२ पैकी २९ जागा भाजपाला तर २७ काँग्रेसला मिळाल्या. या २७ जागा म्हणजे काँग्रेस शून्यावरून ५० टक्क्यावर आल्याचे नेते सांगत आहे. परंतु या पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांची गटबाजी थांबायचे नाव घेत नाही. उलट त्यांच्यामध्ये कुठे उघड तर कुठे छुपी स्पर्धा पहायला मिळते. सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीला नवीन अध्यक्ष आणि त्यानंतर येणाऱ्या विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता पुढील चार वर्ष कोणतेच काम नसल्याने अनेक जण जिल्हाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेस पक्षाच्या राजकीय रणांगणातील एका नेत्याने तर आधी जिल्हाध्यक्ष व नंतर विधान परिषदेचे तिकीट असे दुहेरी टार्गेट आपल्या ‘दूरदृष्टी’पुढे ठेवले आहे. विधान परिषद लढविण्याची अनेकांची मनिषा आहे. त्या दृष्टीने त्यांनी छुपी चाचपणी व मोर्चेबांधणीही चालविली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी सर्वच राजकीय पक्ष अमरावती विभागाच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यात भाजपाच्या रणजित पाटलांना चीत करण्यासाठी काँग्रेसमध्ये एका जुन्या दीर्घ अनुभवी व अभ्यासू नेत्याला रणांगणात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)