शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संगणक टंकलेखनमधील 'पुढील परीक्षेसाठी पात्र'ने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ; परीक्षा परिषदेकडून स्पष्टीकरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 13:12 IST

राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेतील निकालात झालेल्या घोळामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. या परीक्षेच्या गुणपत्रिकेत रिझल्टच्या रकान्यात पास, नापास असा कुठलाही उल्लेख न करता 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम' अर्थात 'पुढील परीक्षेसाठी पात्र' एवढाच उल्लेख करण्यात आला आहे.

परिषदेच्या वतीने नोव्हेंबर २०२१ मध्ये शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. इंग्रजी, मराठी, हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिटाची ही परीक्षा राज्यातील एक लाख सात हजार ९६० विद्यार्थ्यांनी दिली. ठिकठिकाणच्या इन्स्टिट्यूटवर ही परीक्षा पार पडली. दोन दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गुणपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे. तांत्रिक किंवा इंटरनेटसह इतर दोषांमुळे विद्यार्थ्यांचा पेपर सबमिट झाला नसावा, अशी काही कारणे यासाठी सांगितली जात आहेत. मात्र, यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. पुढील परीक्षेकरिता या विद्यार्थ्यांना पुन्हा सहा महिने थांबावे लागणार आहे. शिवाय परीक्षा व इतर शुल्क भरावे लागेल काय, याविषयीसुद्धा संभ्रम आहे.

परीक्षेचा खर्च ४७०० रुपये

सदोष गुणपत्रिका हाती आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा हीच परीक्षा द्यायची झाल्यास चार हजार ७०० रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. यामध्ये १०० रुपये प्रवेश, ५०० रुपये परीक्षा, ५०० रुपये सामग्री फी आणि सहा प्रॅक्टिसचे ३६०० (दरमहा ६०० रुपये सहा महिने) रुपये खर्चाचा समावेश आहे. दुसरीकडे 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम' याचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. ही परीक्षा आपण पास झालो, पुढील परीक्षेसाठी पात्र ठरलो, असेही समजून घेतले जात आहे.

सदोष निकालासाठी परीक्षा केंद्रावरील आयटी टीचर जबाबदार आहे. परिषदेच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत आहे, ऑनलाईन निकालाच्या तारखेपासूनच या विद्यार्थ्यांना बिनशर्त निकाल देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा प्रश्न लावून धरला जाईल.

- तुळशीदास खसाळे, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा वाणिज्य शिक्षण संस्थांची संघटना

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रVidarbhaविदर्भ