शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

By admin | Updated: July 13, 2016 03:08 IST

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा

समित्या निष्क्रिय : प्रशासन म्हणते, लेखी तक्रारी करा यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा मिळावा या हेतुने तब्बल १८४८ ग्रामसमित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु या समित्यांकडून मदत वाटपात दूजाभाव होत असल्याचा सूर आता ग्रामीण जनतेतून निघू लागला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी शासनाकडून या दोन जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना गावातच सर्वप्रकारची मदत मिळावी, या हेतुने यवतमाळ जिल्ह्यात गावागावात १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीचा अध्यक्ष सबंधित गावातील सरपंच व सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहे. समितीमध्ये गावातील इतर नागरिकांचाही समावेश आहे. कोणत्याही गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये, याची महत्वाची जबाबदारी त्या गावातील सबंधित समितीकडे आहे. गावातील कुण्याही नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची माहिती काढून त्याला तातडीने आवश्यक ती आर्थिक, मानसिक मदत या समितीद्वारे करण्यात यावी, असे निर्देश आहेत. त्यासाठी प्रत्येक समितीला एक लाख रुपये खर्चाची मूभा देण्यात आली असून पैसेही त्यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. परंतु आता हे पैसे वाटपात समितीकडून दूजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातीलच नागरिक तक्रारी करीत आहेत. आपल्या जवळच्या अथवा नातेवाईकांनाच समित्या पैसे वाटप करीत आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहत आहे, तसेच ठरवून दिलेल्या निकषांची पायमल्ली करून या पैशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या समित्यांवर सबंधित गटविकास अधिकारी व इतरांचा पाहिजे तसा वॉच दिसून येत नाही. समित्यांच्या संपर्कात तालुका पातळीवरील अधिकारी नाहीत. त्यामुळे या समित्या नेमक्या काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतपत समित्या सोडल्या तर उर्वरित ग्राम समित्यांचे कामकाज ढेपाळले आहे. समित्यांच्या स्थापनेपासून किती व कोणत्या गरजू शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करण्यात आली याची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिल्या गेली नाही. त्यामुळे शासनाने ज्या हेतुने बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्ह्यात राबविणे सुरू केले आहे, त्या हेतुलाच कुठेतरी हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)