शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

By admin | Updated: July 13, 2016 03:08 IST

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा

समित्या निष्क्रिय : प्रशासन म्हणते, लेखी तक्रारी करा यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा मिळावा या हेतुने तब्बल १८४८ ग्रामसमित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु या समित्यांकडून मदत वाटपात दूजाभाव होत असल्याचा सूर आता ग्रामीण जनतेतून निघू लागला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी शासनाकडून या दोन जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना गावातच सर्वप्रकारची मदत मिळावी, या हेतुने यवतमाळ जिल्ह्यात गावागावात १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीचा अध्यक्ष सबंधित गावातील सरपंच व सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहे. समितीमध्ये गावातील इतर नागरिकांचाही समावेश आहे. कोणत्याही गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये, याची महत्वाची जबाबदारी त्या गावातील सबंधित समितीकडे आहे. गावातील कुण्याही नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची माहिती काढून त्याला तातडीने आवश्यक ती आर्थिक, मानसिक मदत या समितीद्वारे करण्यात यावी, असे निर्देश आहेत. त्यासाठी प्रत्येक समितीला एक लाख रुपये खर्चाची मूभा देण्यात आली असून पैसेही त्यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. परंतु आता हे पैसे वाटपात समितीकडून दूजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातीलच नागरिक तक्रारी करीत आहेत. आपल्या जवळच्या अथवा नातेवाईकांनाच समित्या पैसे वाटप करीत आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहत आहे, तसेच ठरवून दिलेल्या निकषांची पायमल्ली करून या पैशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या समित्यांवर सबंधित गटविकास अधिकारी व इतरांचा पाहिजे तसा वॉच दिसून येत नाही. समित्यांच्या संपर्कात तालुका पातळीवरील अधिकारी नाहीत. त्यामुळे या समित्या नेमक्या काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतपत समित्या सोडल्या तर उर्वरित ग्राम समित्यांचे कामकाज ढेपाळले आहे. समित्यांच्या स्थापनेपासून किती व कोणत्या गरजू शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करण्यात आली याची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिल्या गेली नाही. त्यामुळे शासनाने ज्या हेतुने बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्ह्यात राबविणे सुरू केले आहे, त्या हेतुलाच कुठेतरी हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)